AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Arrest : साताऱ्यातील नरबळी प्रकरणात चौघांना अटक, तीन वर्षांपूर्वीच्या खुनामागील रहस्याचा धक्कादायक उलगडा

एका आजीबाईने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनासाठी चक्क आपल्या नातीचा नरबळी दिला, असा धक्कादायक खुलासा 16 वर्षांच्या मुलीच्या हत्याकांडाच्या तपासातून झाला आहे.

Satara Arrest : साताऱ्यातील नरबळी प्रकरणात चौघांना अटक, तीन वर्षांपूर्वीच्या खुनामागील रहस्याचा धक्कादायक उलगडा
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 2:13 AM
Share

सातारा : साताऱ्यात 16 वर्षांच्या मुलीचा खून (Murder) झाल्याची घटना 3 वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेतील 4 आरोपींना सातारा पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्या चौकशीतून अंधश्रद्धे (Superstition)चे कारण पुढे आले आहे. गुप्तधनासाठी आजीनेच नातीचा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी येथे पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या दिवशी ही घटना घडली होती. मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर तिचा एका उसाच्या शेतात धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. हा खून मुलीच्या आजीनेच केला असल्याचे उघड झाले आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीबाईनेच हे सर्व कृत्य केले आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सुरुवातीला पोलिसांना मुलीच्या आई-वडिलांवर आला होता संशय

घटनेच्या सुरुवातीला पोलिसांना मुलीच्या आई-वडीलांवर संशय आला होता. त्याच संशयातून वडिलांना या प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. मात्र तपास सुरु असताना काही संशयित पुरावे हाती लागले. त्या पुराव्यांतून मुलीच्या आजीचा खुनामागे हात असल्याचा संशय बळावला. मुलीला तिच्या आजीनेच मांत्रिकाच्या मदतीने जीवे मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या मुलीची आजी रंजना लक्ष्मण साळुंखे, कमला आनंद महापुरे, जादूटोणा करणारे होलसिंग राठोड (विजापुर, कर्नाटक) आणि विक्रम राठोड (सोलापुरचा रहिवाशी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी मिळूनच अल्पवयीन मुलीची हत्या केली. हत्या करण्यामागचा उद्देश हा जादूटोणा आणि गुप्तधन मिळवणे हाच होता, असे तपासात उघड झाले असल्याचे पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सांगितले.

आजीनेच आपल्या नातीचा नरबळी दिला

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आजही व्यापक प्रमाणात चळवळ सुरु आहे. मात्र समाजातून अजूनही अंधश्रद्धेची कीड नाहीशी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील तीन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या घटनेतून याची प्रचिती आली आहे. एका आजीबाईने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनासाठी चक्क आपल्या नातीचा नरबळी दिला, असा धक्कादायक खुलासा 16 वर्षांच्या मुलीच्या हत्याकांडाच्या तपासातून झाला आहे. पाटण तालुक्यातील करपेवाडीत ही खळबळजनक घटना घडली होती. पोलीस तपासात या हत्याकांडातील नेमक्या कारणाचा उलगडा झाल्यानंतर पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. आजीबाईचा गुप्तधनाचा हव्यास एका निष्पाप अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतल्याबद्दल पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Four arrested in connection with the murder of a girl three years ago in Satara)

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.