AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain | महापुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका, गडचिरोलीतील सोमनूर आणि सोमनपल्ली गावातला थरार

जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपर्यंत शाळा तसेच आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता 16 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत.

Heavy Rain | महापुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका, गडचिरोलीतील सोमनूर आणि सोमनपल्ली गावातला थरार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 14, 2022 | 9:29 AM
Share

गडचिरोलीः जिल्ह्यातील (Gadchiroli Rain) मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांनाही पूर आला आहे जिल्ह्यातील इंद्रावती (Indrawati river) नदीनेही सततच्या पावसामुळे रुद्रावतार धारण केला. यामुळे सोमनपल्ली सोमनूर या भागात पूरस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील अनेक लहान-मोठ्या घरांमध्ये पाणी शिरलं असून नागगरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. काल बुधवारी स्थानिक प्रशासनाने एक मोठी आव्हानात्मक कामगिरी केली. सोमनूर आणि सोमनपल्ली या गावात पुरात अडकलेल्या तीन गर्भवती महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना सुखरुप आरोग्यकेंद्रापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे गावकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत.

सिरोंचा तालुक्यातील घटना

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. येथील इंद्रावती नदीला पूर आल्याने महाराष्ट्राच्या टोकावरती असलेल्या सोमनपल्ली सोमनूर भागात पाण्यानं रुद्रावतार घेतला. मात्र सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी Sdrf पथकाच्या मदतीने तीन गर्भवती महिलांना पुरातून सुरक्षित स्थळी आणलं. या महिलांची नावं पुढीलप्रमाणे-

  • ज्योती सुधाकर गोड्डे
  • लक्ष्मी सुनेश गावडे
  • सपना महेश पिरला

यापैकी सपना पिरला यांची प्रसूती 17 तारखेला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तर ज्योती या सहा महिन्यांची गर्भवती आहेत. या तिघींनाही असरअली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलंय.

16 जुलैपर्यंत शाळा नाही

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागासह शहरातही प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यातच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 13 जुलैपर्यंत शाळा तसेच आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता 16 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले आहेत. अहेरी, सिरोंचा आणि भामरागड तालुक्यात गंभीर स्थिती आहे. तर गडचिरोली, आरमोरी भागातही मोठा पाऊस सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून अतिशय आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप