AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणवासीयांना गणराया पावले, 278 स्पेशल रेल्वेनंतर महामंडळाकडून 4300 बसेस, एसटीत सवलतीचा प्रवास

Ganpati Train and bus Konkan: गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

कोकणवासीयांना गणराया पावले, 278 स्पेशल रेल्वेनंतर महामंडळाकडून 4300 बसेस, एसटीत सवलतीचा प्रवास
st bus
| Updated on: Aug 01, 2024 | 9:19 AM
Share

मुंबईतील हजारो चाकरमाने गणपतीसाठी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे त्या काळात बसेस आणि रेल्वेचे आरक्षण मिळणेही अवघड असते. अनेकांना खासगी गाड्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गावी जाण्याचे वेध चाकरमान्यांना लागले आहे. त्यांच्यासाठी रेल्वेने 278 स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाने 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीत मिळणार सवलती

मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने तयारी केली आहे. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मागील वर्षी 3500 बसेस

गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.

रेल्वेने आणखी 20 फेऱ्या वाढवल्या

मध्य आणि पश्चिम रेल्वे 1 ते 19 सप्टेंबर दरम्यान 259 विशेष रेल्वे सोडणार होते. परंतु प्रवाशांची मागणी पाहिल्यावर आणखी 20 रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईवरुन कोकणात जाण्यासाठी 278 रेल्वे असणार आहे.

गणोशोत्सवासाठी या 20 विशेष रेल्वे

  • 01031/2 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस (8 फेऱ्या)
  • 01445/6 पुणे-रत्नागिरी-पुणे (2 फेऱ्या)
  • 01441/2 पनवेल-रत्नागिरी-पनवेल (2 फेऱ्या)
  • 01447/8 पुणे-रत्नागिरी-पुणे ( 4 फेऱ्या)
  • 01443/4 रेल्वे 4 फेऱ्या सोडणार आहेत.

हे ही वाचा…

कोकणातील चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला, विशेष रेल्वेच्या 278 फेऱ्या

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.