भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, त्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केल्याचं पहायला मिळालं आहे.

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पञकार वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बोलताना राज्यातील विविध समस्यांचा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये चांगलाचं समाचार घेतला. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. हिंदी भाषीक रिक्षा चालकांना आता मराठी शिकवली जाणार आहे, यावर बोलताना देखील राज ठाकरे यांनी यावेळी मिश्कील टिप्पनी केल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मला ही आशा आहे. मी निराश नाही, मी ही पत्रकारीतेमधून आलो आहे. पञकारिता बदललीय यात काही प्रश्न नाही. पञकारिताच्या जाणिवा मेल्या नाही तर सरकार तुम्हाला किंमत देत नाहीये. चांगले चांगले पञकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. राजकारण्यांना तुमची भीती वाटली पाहिजे. परंतु आता कसेल त्याची जमीन नाही तर ज्याला दिसेल त्याची जमीन असं झालं आहे. मुंबईमध्ये हजारो अनाधिकृत बांधकामे कशी झाली? अदानींचा विषय मी मांडला त्याचं पुढे काय झालं? पत्रकारांनी हा विषय पुढे लावून का धरला नाही? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. विरोधात बातमी टाकली की संपादकावर दबाव येतो दबाव आला की त्यांच्या बातम्याच बंद करा. नोकरी टिकवायची म्हणून पत्रकारिता सुरू आहे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आली पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं होतं. आता या रिक्षा चालकांना मराठी शिकवली जाणार आहे, यावर बोलताना राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केल्याचं पहायला मिळालं. सध्या भैय्यांना मराठी भाषा शिकवायचं काम सुरू आहे. त्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या पत्रकारितेमध्ये देखील येतील, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे. ही गोष्ट त्यांनी गुजरातमध्ये करून दाखवावी, जिथं जमीन भुसभुशीत असते तिथंच घुशी होतात, असा हल्लाबोलही यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
