AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

कोल्हापूरच्या निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Hasan Mushrif on Martyr Sangram Patil House Dream)

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू; हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
| Edited By: | Updated on: Nov 23, 2020 | 9:55 AM
Share

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील (Martyr Sangram Patil) यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संग्राम पाटील याचं पार्थिव कोल्हापुरातील निगवे खालसा गावात दाखल झाले आहे. गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी निगवे खालसा गावाला भेट दिली. यावेळी मुश्रीफ यांनी शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले. (Hasan Mushrif on Martyr Sangram Patil House Dream)

हसन मुश्रीफ यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की, “आज करवीर येथील निगवे खालसा गावाला भेट देत शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करु, अशी आदरांजली वाहिली.

शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्यामागे आई- वडील, पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिंमत परमेश्वराने पाटील कुटुंबियांना द्यावी, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो”.

“पाटील परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. पाटील कुटुंबियांच्या आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच.

परंतु मी आज वर्तमानपत्रात वाचले की शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन. तसेच सोमवारी सकाळी अलोट गर्दीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी संयम पाळून अखेरची मानवंदना द्यावी, असे आवाहनही केले”.

मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुले परिस्थितीशी झगडत भारतीय सैन्यदलात भरती होत असतात. भारतमातेच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून ऊन, वारा, पाऊस आणि शत्रू अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी ते दररोज झगडत असतात. जवान शहीद झाल्यानंतर काही दिवस समाज त्यांना सहानुभूती दाखवतो. काळाच्या ओघात पुढे विसरून जातो आणि ही कुटुंब उघड्यावर पडतात, असे होता कामा नये. या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव हिमालयासारखे उभे राहिले पाहिजे”.

शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना (21 नोव्हेंबर) वीरमरण आलं. यानंतर दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले आहे. शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव काश्मीरमधून विमानाने पुणे विमानतळावर येथे दाखल झाले. त्यानंतर रात्रीच ते पार्थिव कोल्हापुरात दाखल झाले. (Hasan Mushrif on Martyr Sangram Patil House Dream)

संबंधित बातम्या : 

आठवडाभरात कोल्हापूरचा दुसरा जवान शहीद, निगवेचे संग्राम पाटील धारातीर्थी

Sangram Patil Martyr | शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.