AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत
| Updated on: Oct 10, 2020 | 7:53 AM
Share

अहमदनगर : “राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे,” असेही राजेश टोपे म्हणाले. अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

“येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल,” अशी अपेक्षा करूया असे राजेश टोपे म्हणाले.

“कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे,” असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.

“तसेच आरटी पीसीआर टेस्टची किंमत 800 रुपयांपर्यंत आणला आहे. याची किंमत केंद्र सरकारने साडे चार हजार रुपये ठरवली होती. मात्र आम्ही दोन टप्यात तो खाली आणला आहे. तसेच येत्या आठवड्यात तो आठशे रुपयांपर्यंत आणणारा असा सूतोवाच राजेश टोपे यांनी केला आहे. त्याशिवाय मास्कच्या किंमतीदेखील खाली आणल्याचं टोपे यांनी सांगितलं.”

राज्य सरकारचं काम अत्यंत पारदर्शक 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रिपब्लिकन न्यूज चॅनलचा टीआरपी प्रकरण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशासह इतर गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

“रिपब्लिकन न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. तसेच विनाकारण यंत्रणेला पोलीस खात्याला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे,” असे स्पष्ट मत टोपेंनी मांडलं आहे.

“महाराष्ट्र सरकार हे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. सरकार कोरोना काळात अत्यंत पारदर्शक आणि जेवढ्या जमेल तेवढ्या कार्यक्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्याकडून लक्ष विचलित करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत असतील तर ते चुकीचं आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या लोकांनी वाट करुन दिली पाहिजे 

त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशासंदर्भात टोपे यांनी भाष्य केलं आहे. “जर योग्य लोक असतील तर राष्ट्रवादी नेहमीच त्यांचं स्वागत करतो. तसेच पक्ष कर्तृत्ववान माणसाला स्वीकारतच असतो. प्रत्येक पक्षात लोक कर्तृत्ववान असतात. जर कोणी येऊ इच्छित असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना वाट करून दिली पाहिजे,” असा सल्ला राजेश टोपेंनी दिला आहे. (Health Minister Rajesh Tope On Maharashtra Unlock)

संबंधित बातम्या : 

लोकशाहीचा चौथास्तंभ कमकुवत करण्याचं कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड : सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकला आहे, थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधेन : संभाजीराजे

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.