AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain : ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट?

21 ते 23 एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तशी माहिती के. एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

Heavy Rain : ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट?
बेळगाव अवकाळी पावसाचा तडाखा Image Credit source: tv9
| Updated on: Apr 19, 2022 | 11:20 PM
Share

पुणे : सध्या कडाक्याच्या उन्हाने (Summer Heat) सर्वांनाच हैराण केलं आहे. पण अशात 21 ते 23 एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तशी माहिती के. एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तसेच 21- 23 April काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. असे ट्विट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर (IMD)यांनी केले आहे. त्यामुळे अनेक फळबागा उत्पादकांची चिंता वाढली आहे. राज्यात सध्या कडाक्यााचे उन पडत आहे. काही जिल्ह्याचा पारा हा अजूनही चाळीस डिग्रीच्या पुढे आहे. अशात पावसाचा इशारा मिळाल्याने आता शेतकऱ्यांची चिंता चांगलीत वाढली आहे. हातातोंडाला आलेही पिकं पुन्हा मातीसोल होण्याची भिती बळीराजाला लागली आहे.

कोणते जिल्हे अलर्टवर?

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ज्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत सध्या जास्त वाढ झालीआहे. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण हवामानावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

अनेक जिल्हे अलर्ट मोडवर

शेतकऱ्यांची चिंता वाढली

गेल्या दोन वर्षात कोरोनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकदा सततच्या लॉकडाऊनमुळे शतमाल हा शेतात सडून गेला आहे. यंदा सर्व सुरळीत होत असताना चार पैसे शेतकऱ्याच्या खिशात उरतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र पावसामुळे पुन्हा पिकं वाया जाण्याची भिती आता बळीराजाला अस्वस्थ करत आहे. आधीही अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता अनेक फळबागा तोडणीला आलेल्या आहेत. या फळबागाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठा खर्च केला आहे. ते कर्ज फेडण्याचे आव्हान आता शेतकऱ्यांसमोर असणार आहे.

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.