AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कुठे किती पाऊस? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.

महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कुठे किती पाऊस? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर
| Updated on: May 26, 2025 | 5:13 PM
Share

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशीही ते सातत्याने संपर्कात आहेत.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे.  70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.

इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.  फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफचं एक पथक फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. – मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील 24 तासांमध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठाण्यालाही पावसानं झोडपलं

ठाण्यातही जोरदार पाऊस झाला आहे, रात्रभर संपूर्ण जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता, बदलापूर, मुरबाड परिसरात पावसाची तीव्रता जास्त होती,  जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात पाऊस झालेला आहे, मात्र सर्व परिसरात आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

काही वेळाकरिता बदलापूर रेल्वे स्थानकात पाणी साचलं होतं, ते आता पूर्णपणे मार्गी लागलं आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे. लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहेत, पण कुठेही पूर्णपणे ट्रेन ठप्प झालेली नाही. सकाळच्या वेळी ट्रेन उशिराने धावत असल्याची परिस्थिती होती, सर्व ठिकाणची रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहेत.

पावसाळ्यात नौसर्गिक आपत्ती, पाऊस, पाणी तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाचं काम सुरू असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 700 धोकादायक इमारती आहेत, त्यातील कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांरीत करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. 70 ते  80 टक्के नालेसफाई पूर्ण झालेली आहे. तीन ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत, या घटनेत  काही ठिकाणी जाणवरांचा मृत्यू झालेला आहे, एका ठिकाणी एका व्यक्तीचा देखील मृत्यू झालेला आहे. यासाठी आपण वीज अटकावं केंद्र उभं केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत उल्हास नदी धोक्याच्या पातळीपेक्षा बरीच खाली वाहत आहे, प्रशासन लक्ष ठेऊन आहे,  त्याठिकाणी जाऊन पाहणी देखील केलेली आहे, सध्या परिस्तितीत कुठल्याही नदीची पातळी धोक्याच्या वर गेलेली नाही, रस्ते सुरळीत सुरु आहेत, रेल्वे सुरु आहे. माझी फक्त विनंती आहे या परिस्थितीत लोकांनी आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडावं एवढंच सर्वांना आवाहन असंही यावेळी ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा