AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्याताला पावसाचा तडाखा, पिकांचं प्रचंड नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेतला जात असून, याच दरम्यान त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! राज्याताला पावसाचा तडाखा, पिकांचं प्रचंड नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2025 | 5:57 PM
Share

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. बळीराजा हवालदिल झाला असून, आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्याच्यापुढे आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका यंदा मराठवाड्याला बसला आहे, प्रचंड पावसामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढला पडला असून, गावांचा सर्पंक तुटला आहे. घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. संसारोपयोगी वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पाळीव जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. शेताची अवस्था तर याहून बिकट आहे. शेतांमध्ये पाणी साचलं आहे, उभी पीक आडवी झाली आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी औसा तालुक्यात जाऊन नुकसानाची पहाणी केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली, नुकसानाचा आढावा घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आहे. बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही सर्व निकष बाजूनला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत कणार आहोत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ड्रोनचा पंचनामा असला तर आम्ही मान्य करू, मोबाईलवर फोटो असला तरी नुकसानीचा पंचनामा मान्य होणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले टंचाई म्हणजे दुष्काळ,  त्यामुळे टंचाईच्या काळात ज्या-ज्या उपाय योजना लागू केल्या जातात त्या -त्या सर्व उपाय योजना आम्ही लागू करणार आहोत, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत. दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पिकांच्या नुकसानाचा आढावा घेतला आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?