AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : माझ्या जीवनाचा विचार करा… मला पत्नी मिळवून द्या; शरद पवार यांना लग्नाळू तरुणाचं पत्र

अकोल्यातील एका ३४ वर्षीय शेतकरी तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्याने थेट शरद पवारांना पत्र लिहिले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलगी मिळत नसल्याची व्यथा मांडत, त्याला जीवनसाथी मिळवून देण्याची विनंती केली. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Sharad Pawar : माझ्या जीवनाचा विचार करा...  मला पत्नी मिळवून द्या; शरद पवार यांना लग्नाळू तरुणाचं पत्र
लग्नासाठी तरूणाने शरद पवारांना घातलं साकडं Image Credit source: social media
| Updated on: Nov 13, 2025 | 12:10 PM
Share

लग्न करून सुखाचा संसार करण्याचं, जोडीदारासोबत एकत्र जगण्याचं, हसत-खेळतं कुटुंब असण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. बहुतांश लोकांचं लग्न जमतं, मनासारखा जोडीदारही मिळतो, पण काही लोकं असे असतात ज्यांचं लग्नच जमत नाही, वय वाढूनही त्यांचा विवाह योग काही येत नाही. असाच एक तरूण आहे अकोल्याच्या ग्रामीण भागातला. वय वाढूनही लग्न न झाल्याने त्या तरूणाने मदतीसाठी थेट याचना केली ती ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद वापर यांच्याकडे. त्या तरूणाने शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली.

वय वाढूनही माझं लग्न होत नाहीये, नवं आयुष्य सुरू करण्यासाठी जोडीदार मिळवू द्या अशी विनंती त्याने पत्रातून शरद पवार यांना केली असून सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

तुमचे उपकार विसरणार नाही, लग्नासाठी तरूणाचं शरद पवारांना साकडं

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या या तरूणाने शरद पवार यांच्यासाठी हे पत्र दिलं. शरद पवार अकोल दौऱ्यावर असताना हे पत्र देण्यात आलं. – “मी शेतकरी वर्गातील आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कुणीही मुलगी देत नाही. वय 34 झालं पण मुलगी मिळत नाही,” असं म्हणत त्याने शरद पवारांकडे विनंती केली आहे. त्याची ही मागणी ऐकून सर्वत अवाक् झाले, सध्या हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

काय म्हटले आहे पत्रात ?

माझे वय सध्या 34 वर्षांचे पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस माझे वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही व मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्यामार्फत मिळवून दयावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकेन. व पुढील आयुष्य गुण्या-गोविंदाने जगू शकेल. मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे. व मुलीच्या माहेरीसुद्धा जाण्यास तयार आहे. मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तऱ्हेने काम करेन याची हमी देतो.

तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपुरवक विचार करावा आणि मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही विनंती . मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही – असं त्या तरूणाने शरद पवारांना लिहीलेल्या पत्रात नमूद केलं आहे. हे पत्र समोर आल्यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

त्या तरूणासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न करणार – अनिल देशमुख

हे पत्र मिळाल्यावर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगिल्याचं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यांच्या सूचनेनुसारच, त्या तरूणाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले. ” अकोला येएथे एका तरूणाने हे पत्र पवार साहेबांना दिलं, दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मीटिंग होती, त्यांच्यासमोर हे पत्र जयंत पाटील यांना वाचायला दिलं, त्यानंतर या तरूणाच्या लग्नासाठी मदत करण्यास पवार साहेबांनी सांगितलं. त्यानुसार आता राष्ट्रवादी पवार गटाचे नेते त्या तरुणाला लग्नासाठी मुलगी शोधण्याची प्रयत्न करणार आहेत. विदर्भात त्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून प्रयत्न करणार ” असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?