AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी

OBC Elgar chhagan bhujbal | हिंगोली येथील एल्गर सभेतून ओबीसी नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकावर हल्ला केला. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही घेरले. सरकार गावबंदी करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे की नाही? घटनेनुसार कारवाई होणार आहे की नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी
छगन भुजबळImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 26, 2023 | 4:11 PM
Share

हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | भारतीय राज्यघटनेने सर्वांना देशात सर्वत्र फिरण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र दिले आहे. यामुळे कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गावबंदी केली तर एका महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ज्यांनी गावबंदीचे बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षा करा. आता सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे की नाही? पोलीस हे करणार आहे की नाही? राज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर केला. तसेच राजेश टोपे, रोहित पवार यांचे तुम्ही स्वागत करतात. त्यांच्यासाठी गावबंदी नाही, परंतु आमच्या नेत्यांना गावबंदी केली जात आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

बीडमध्ये आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही

बीडमध्ये घर जळाली. हॉटेल जळाले गेले. परंतु त्यांचे आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही. बीड त्यांनीच पेटवले, असा आरोप छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केले. राज्याच्या मंत्रालयात आयएएस, आयपीएस अधिकारी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० टक्के सुवर्ण आरक्षाचा फायदा ८५ टक्के मराठ्यांना होत आहे. त्यानंतरही ओबीसींना बाजूला करुन सर्व आरक्षण मराठ्यांना देण्याचा प्रयत्न सुरु आहे.आमदार नारायण कुचे, भास्कर पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना गावबंदी करणार आणि राजेश टोपे आले, रोहित पवार आले त्यांचे स्वागत करणार? असा प्रश्न भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.

एकदाची जातीय जनगणना कराच

राहुल गांधी जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असे भुजबळ यांनी म्हटले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?