AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी

OBC Elgar chhagan bhujbal | हिंगोली येथील एल्गर सभेतून ओबीसी नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकावर हल्ला केला. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनाही घेरले. सरकार गावबंदी करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे की नाही? घटनेनुसार कारवाई होणार आहे की नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

गावबंदी केल्यास शिक्षा काय? छगन भुजबळ यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी
छगन भुजबळImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 26, 2023 | 4:11 PM
Share

हिंगोली, दि. 26 नोव्हेंबर 2023 | भारतीय राज्यघटनेने सर्वांना देशात सर्वत्र फिरण्याचा अधिकार दिला आहे. बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र दिले आहे. यामुळे कोणाला गावबंदी करता येऊ शकत नाही. गावबंदी केली तर एका महिन्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. ज्यांनी गावबंदीचे बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षा करा. आता सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे की नाही? पोलीस हे करणार आहे की नाही? राज्यात सर्वत्र लावलेले गावबंदीचे बोर्ड काढा. पोलिसांनी राज्यघटनेप्रमाणे कारवाई करावी, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर केला. तसेच राजेश टोपे, रोहित पवार यांचे तुम्ही स्वागत करतात. त्यांच्यासाठी गावबंदी नाही, परंतु आमच्या नेत्यांना गावबंदी केली जात आहे, अशी खरमरीत टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

बीडमध्ये आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही

बीडमध्ये घर जळाली. हॉटेल जळाले गेले. परंतु त्यांचे आश्रू पुसण्यास कोणी गेले नाही. बीड त्यांनीच पेटवले, असा आरोप छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केले. राज्याच्या मंत्रालयात आयएएस, आयपीएस अधिकारी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० टक्के सुवर्ण आरक्षाचा फायदा ८५ टक्के मराठ्यांना होत आहे. त्यानंतरही ओबीसींना बाजूला करुन सर्व आरक्षण मराठ्यांना देण्याचा प्रयत्न सुरु आहे.आमदार नारायण कुचे, भास्कर पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना गावबंदी करणार आणि राजेश टोपे आले, रोहित पवार आले त्यांचे स्वागत करणार? असा प्रश्न भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.

एकदाची जातीय जनगणना कराच

राहुल गांधी जातीय जनगणनेची मागणी करत आहे. इतर पक्षातूनही ही मागणी पुढे येत आहे. मग एकादाची जातीय जनगणना करा आणि ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मग समजणार कोण मागास आहे. बिहार करु शकतो तर महाराष्ट्र का करु शकत नाही. जनगणनेत जे येईल, ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, असे भुजबळ यांनी म्हटले.

पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला
'हर हर महादेव'च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला.
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात
शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना! हर्षवर्धन सपकाळ वादाच्या भोवऱ्यात.
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?
शरद पवार मविआकडूनच राज्यसभेवर जाणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?.
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!.
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!.
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप.
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात.
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.