AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेत्यांमध्ये चलबिचल झाली तर, पवार साहेबांना सांगू इच्छुतो, रोहित पवार यांची थेट मागणी काय?

आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. एक्झिट पोलमध्ये जे काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले. पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार आहे.

नेत्यांमध्ये चलबिचल झाली तर, पवार साहेबांना सांगू इच्छुतो, रोहित पवार यांची थेट मागणी काय?
ROHIT PAWAR AND SHARAD PAWAR
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Dec 02, 2023 | 10:46 PM
Share

वाशिम | 2 डिसेंबर 2023 : निवडणुका आल्या की काही लोक नाटक करतात. सोयीचे राजकारण करतात. 2013 साली देवेंद्र फडणवीस गाडीभर पुरावे घेऊन अधिवेशनात आले होते. त्यावेळी बैलगाडीच्या चाकांच्या रेषा दिसल्या. मात्र, पुरावे काहीच दिसले नाहीत. लोकं तुमच्या विरोधात बोलतात तेव्हा तुम्हाला ईडी, सीबीआयची भीती दाखविली जाते. पण, ते तुमच्याकडे आले की ते दुधासारखे पवित्र होतात, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आजचा १७ वा दिवस आहे. वाशिम जिल्ह्यात ही यात्रा पोहोचली आहे. वाशीम जिल्ह्यातील पारगाव येथील श्री भवानी देवी मंदिर येथे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब आरती केली. त्यानंतर त्यांची संघर्ष यात्रा सुरु झाली. या यात्रेत रोहित पवार यांचे संपूर्ण कुटुंब युवा संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते.

संघर्ष यात्रा सुरु होण्यापूर्वी रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. एक्झिट पोलमध्ये जे काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले. पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार आहे.

उद्या पाच राज्यातील निकाल येणार आहेत. पाच राज्याच्या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल होणार आहे असा दावा रोहित पवार यांनी केला. पण, मी शरद पवार साहेबांना सांगू इच्छुतो की संकटाच्यावेळी जे निष्ठावन सोबत आहेत त्यांचाच विचार आपण करावा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याच मुद्यावर बोलताना जे एकदा गेले ते परत येत नाही. त्यामुळ मी त्यांची चिंता करत नाही. जे समोर आणि आपल्यासोबत आहेत, मी फक्त त्यांचाच विचार करतो असे म्हटले आहे. अ, ब, क आणि ड गेले तरी चालतील. कारण, आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्हाला कशाची चिंता नाही. पवार साहेबांमुळं राष्ट्रवादी काँग्रेसची नौका कधीच बुडू दिली नाही, पुढं ही ती बुडणार नाही.

पवार साहेबांची साथ सोडून गेलेले आज स्पष्टीकरण देतायेत. आपल्याला त्याची फिकीर करायची गरज नाही. आपण जनतेसोबत राहून ताकद दाखवली की तीच जनता आपल्याला आज ना उद्या सत्ता देईल. सध्या आपल्याला बिघडलेली सामाजिक घडी सुरळीत करायची गरज आहे असे जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री