पाकिस्तानातून कांद्यांची आयात, स्थानिक शेतकरी संतप्त

राज्यात कांद्याचे दर (Onion Rate) वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा (Pakistan Onion) आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर स्थानिक शेतकऱ्यांमधून (Indian Farmers) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानातून कांद्यांची आयात, स्थानिक शेतकरी संतप्त
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 3:39 PM

मुंबई: राज्यात कांद्याचे दर (Onion Rate) वाढल्याने सरकारने पाकिस्तानमधून कांदा (Pakistan Onion) आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर स्थानिक शेतकऱ्यांमधून (Indian Farmers) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच योग्य दर नसल्याने शेती तोट्यात आहे. त्यात आता कुठं कांद्याचे दर वाढले आहेत, तर सरकार बाहेरुन कांदा आयात (Import of Onion) करत आहे. सरकारसाठी पाकिस्तानपेक्षा भारतीय शेतकरी जास्त मोठे शत्रू वाटत आहेत का? असा थेट सवाल राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी विचारला आहे.

सरकारी नियंत्रण असलेली संस्था धातू आणि खनिज व्यापार महामंडळ (MMTC) संस्थेने पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांमधून स्वस्तात कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. शेतकऱ्यांचे खरिप पीक अवघ्या एक महिन्यात बाजारात येणार असताना सरकार आयात कशी करु शकते, असाही प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “एमएमटीसीच्या 6 सप्टेंबरच्या निवेदेप्रमाणे कांद्याची आयात होण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत थांबावे लागणार आहे. त्याच काळात स्थानिक शेतकऱ्यांचाही माल बाजारात येईल. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाचे दर कोसळतील.”

मागील काही काळात कांद्याचे दर कमी राहिल्याने शेतकऱ्यांना बरेच नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना कांद्याची साठवण देखील केली. आता कुठं चांगले दर मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र, सरकारच्या कांदा आयातीच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

कांद्याचे दर काय?

नाशिकमधील लासलगाव कांदा बाजारात कांद्याचे दर प्रतिक्विंटल 2,300 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. प्रमुख शहरांमध्ये हाच कांदा प्रतिकिलो 39-42 रुपये किलोने विक्री केला जात आहे. हेच दर एप्रिलमध्ये कांद्याचे दर 830 रुपये प्रतिक्विंटल आणि मे महिन्यात 931 रुपये इतके होते. जूनमध्ये हे दर वाढून 1,222 रुपये, जुलैमध्ये 1,252 आणि ऑगस्टमध्ये 1,880 रुपये होते. सप्टेंबरमध्ये कांद्याचा सरासरी दर 2,377 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.