AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लोकं टीका करतात भारतातले लोक येथे का उपस्थित असतात, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे करार झाल्याचे सांगतानाच त्यांच्या टीका करणाऱ्या विरोधकांचाही समाचार घेतला आहे...

काही लोकं टीका करतात भारतातले लोक येथे का उपस्थित असतात, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
devendra fadnavis In davos
| Updated on: Jan 22, 2026 | 8:53 PM
Share

दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी १५ लाख कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. या करारा संदर्भात एक करार लोढा यांच्या कंपनीशी झाला आहे. त्यावरुन विरोधकांनी टीका केली आहे की लोढा यांच्याशी करार करायचा तर येथे करायला काय हरकत होती. तेथे जाऊन करार करण्याची गरज काय ? असा सवाल विरोधकांनी केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

राज्यासाठी आपण दावोस येथे आलो आहोत. दावोसला तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज सकाळी तीन पॅनलमध्ये मी गेलो होतो. यात काही एमओयू झाले आहेत. काही इन्व्हेस्टींगेटींग झाले, काही स्ट्रेटेजिक एमओयू झाले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले की गेल्यावेळी झालेले सर्व करार आम्ही रेकॉर्डवर ठेवले होते. त्या संदर्भात विधानसभेत माहिती दिली होती. सर्वच करार काही फलद्रुप होत नाहीत. काही जिओपॉलिटीकल कारणांनी वास्तवात येत नाहीत. परंतू आपल्या राज्याचा रेशो या बाबतही देशात सर्वात जास्त असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पेण आणि रायगड येथे स्मार्ट सिटी तयार करण्याचा करार करण्यात आला आहे. ही पहिली पीपीपी तत्वावरील स्मार्ट सिटी असणार आहे. त्यामुळे प्रायव्हेट लोक आणि एमएमआरडीए अशा खाजगी आणि सरकारी भागीदारीतून हे काम होणार आहे. यासाठी एकूण ९ गुंतवणूकदारांनी प्रत्येकी १ लाख कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुढचा काळ हा एआय आणि सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक चिपचा आहे. यात गुंतवणूक होण्यासाठी आज इनोवेशन इको सिस्टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इनोवेशन इको सिस्टीमची आज जगासमोर आम्ही घोषीत केली. ३० ते ४० लोकांसमोर ही घोषणा केली आहे. टाटा सन्स यांनी ११ बिलीयन डॉलरची यात गुंतवणूक केली आहे. पुढच्या काळातील ग्रोथ जॉब क्रिएशनमुळे यात २० ते ३० लाख जॉब पुढच्या काळात तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टीकेला फडणवीस यांचे उत्तर

काही लोक म्हणतात की भारतातील उद्योजकांनी येथे करार केले या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या एमओयूमध्ये एफडीआय आहे. म्हणजे परदेशी गंतवणूक आहे. त्यांचे फॉरेन पार्टनर येथे उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर हे करार व्हावेत अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे हे करार येथे झाले आहेत. जिओपॉलिटीकल सिच्युएशनमुळे काही एमओयू प्रत्यक्षात फलद्रुप होत नाहीत. मात्र इतर राज्याचे ३५ ते ४० टक्के एमओयू प्रत्यक्षात होतात. तर आपले ६० एमओयू अस्तित्वात येतात अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

Follow Us
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द