AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये “हे” काय झालं, मुंबईनंतर नाशिक कुणाच्या रडारवर?

अतिवृष्टि झाल्याने शहरातील सराफ बाजार, सारडा सर्कल, मुंबई नाका आणि जुने नाशिक परिसर अशा भागात ३ ते ४ चार तास पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यामुळे भूमिगत गटारीच्या कामांवर नागरिकांचा संताप होऊ लागलाय.

नाशिकमध्ये हे काय झालं, मुंबईनंतर नाशिक कुणाच्या रडारवर?
Image Credit source: In Nashik like Mumbai the water was flooded due to heavy rains
| Updated on: Sep 09, 2022 | 11:49 AM
Share

नाशिक : मुंबईची तुंबापुरी होतांना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, आता अशीच काहीशी परिस्थिती नाशिकची ( Nashik ) होऊ लागली आहे. नाशिकमध्ये अवघ्या तीन तासांत अतिवृष्टी (Heavyrain ) झाल्याची नोंद झाली. नाशिकमध्ये ७६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. याचवेळी मात्र नाशिककरांची अक्षरशः दैना झाल्याचे पाहायला मिळाली. मुंबईप्रमाणेच (Mumbai) नाशिकमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने, महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेय.

अतिवृष्टी झाल्याने शहरातील सराफ बाजार, सारडा सर्कल, मुंबई नाका आणि जुने नाशिक परिसर अशा भागात ३ ते ४ चार तास पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यामुळे भूमिगत गटारीच्या कामांवर नागरिकांचा संताप होऊ लागलाय.

मुंबईत ५० ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरी मुंबईची फार काळ तुंबापुरी होत नाही. मुंबईत वारंवार मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासनाने विविध प्रयोग करत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. याच धर्तीवर आता नाशिकच्या प्रशासनाला काम करावे लागणार आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जनवारांसह मानवी जीवित हानी देखील झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालीय.

नाशिकजवळील वंजारवाडी या गावातील पावसाने घर कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. यामध्ये मुलं मात्र थोडक्यात वाचलीय. गवारे कुटुंबावर ही आपत्ती कोसळल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जातेय.

सिन्नर तालुक्यात आठ दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. शेतीसह, वाहने आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक नागरिक वाहून गेले होते, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले होते. वारंवार असा मुसळधार पाऊस होऊ लागल्याने नागरिकांसोबत प्रशासनाची चिंता वाढली आहे.

अतिवृष्टी झाली तरी पाण्याच्या निचरा होणे अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. नाशिकच्या मध्ये ७६.८ मीमि. पाऊस पडला आणि प्रशासनाच्या कामाचे तीनतेरा झालेय. आता यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.