महाराष्ट्रातील या गावात एक डास मारण्यासाठी मिळतात 400 रुपये, श्रीमंत व्हायचंय? मग या गावात एकदा याच

अनेक गाव वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध असतात, महाराष्ट्रामध्ये देखील असं एक गाव आहे, ज्या गावात एक डास जरी मारला तर तब्बल 400 रुपये मिळतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रातील या गावात एक डास मारण्यासाठी मिळतात 400 रुपये, श्रीमंत व्हायचंय? मग या गावात एकदा याच
mosquito
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 13, 2026 | 3:44 PM

भारतामध्ये अशी अनेक गावं आहेत, जी वेगवेगळ्या कारणांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. या गावांना भेटी देण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात. यातील काही गावं ही त्या गावांमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा परंपरांमुळे चर्चेत असतात. तर काही गावं ही त्या गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या काही विशिष्ट निर्णयांमुळे चर्चेचं केंद्र बनतात. भारतात अशी काही गावं आहेत, ज्या गावांमध्ये प्राणी पाळावेत तसे साप पाळले जातात, या गावातील अगदी लहान मुल देखील सापांना घाबरत नाहीत त्यामुळे ही गाव प्रसिद्ध आहेत. तर केरळमधील एक गाव जुळ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अशी गावं लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, ज्या गावात एक डास मारण्यासाठी 400 रुपये दिले जातात. हे ऐकताच हे गाव नेमकं कुठे आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्याही मनात निर्माण झालीच असेल, चला तर मग या गावाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

भारतामध्ये विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध गावं आहेत, मात्र असं एक गाव जे डास मारण्यासाठी पैसे देतं हे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलं नसेल. मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे डास मारण्यासाठी पैसे दिले जातात. या गावाचं नाव आहे, हिवरे बाजार, हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात तुम्हाला एकही कुटुंब गरीब सापडणार नाही, राज्यात सर्वाधिक करोडपती लोक या गावात राहतात. या गावात सध्या स्थितीमध्ये एकूण 305 कुटुंब राहतात. विशेष म्हणजे यातील जवळपास 80 टक्के कुटुंब हे करोडपती आहेत. या गावात भेट देताच कुठलाही पर्यटक या गावाच्या प्रेमात पडतो असं हे गाव आहे. वीजेपासून ते पाण्यापर्यंत अशा सर्व गोष्टींचं काटेकोर व्यवस्थापन या गावात तुम्हाला पाहायला मिळेल.

80 ते 90 च्या दशकात या गावात भयंकर दुष्काळ पडला होता, ग्रामस्थांना खायला अन्न नव्हतं. या काळात अनेकांनी हे गाव सोडलं. मात्र त्यानंतर मोठा कायपालट झाला. गावात दुष्काळानंतर ज्वाइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमेटी स्थापन करण्यात आली. या निर्णयानंतर गावाची परिस्थिती हळुहळु बदलत गेली. गावाला सुधारण्यासाठी येथील ग्रामस्थांनी प्रचंड कष्ट घेतले. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावात एकही डास नाही, ग्रामस्थांचं असं चॅलेंज आहे की, कोणीही इथे एक जरी डास पकडला तर त्याला प्रत्येक डासासाठी 400 रुपये दिले जातील.

 

Follow Us