AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon train accident : स्लीपरच्या दरवाजात लोक बसले होते, तितक्यात… भयानक, धक्कादायक… प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार

कर्नाटककडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. तब्बल 35 ते 40 प्रवाशांना एक्सप्रेसने उडवलं. त्यात जवळपास 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jalgaon train accident : स्लीपरच्या दरवाजात लोक बसले होते, तितक्यात... भयानक, धक्कादायक... प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार
| Updated on: Jan 22, 2025 | 7:10 PM
Share

जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्सप्रेस स्टेशन सोडून दूरवर थांबली होती. त्यामुळे काही प्रवाशी एक्सप्रेसच्या खाली उतरले होते. तितक्यात कर्नाटककडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. तब्बल 35 ते 40 प्रवाशांना एक्सप्रेसने उडवलं. त्यात जवळपास 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. निव्वळ अफवा पसरल्याने प्रवाशांनाचा बळी गेला. विशेष म्हणजे पुष्पक एक्सप्रेस थांबलेली असतानाही प्रवाशांनी अतिघाई केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

संदीप जाधव या प्रवाशाने या अपघाताची माहिती दिली आहे. संदीप जाधव हे सुद्धा पुष्पक एक्सप्रेसने प्रवास करत होते. ही एक्सप्रेस मुंबईकडे निघाली होती. पण मध्येच परधाडीच्या पुढे ही एक्सप्रेस थांबली. ही एक्सप्रेस स्टेशन सोडून लांब जंगलात थांबली होती. काही प्रवाशी स्लीपरच्या दरवाजात बसले होते. गप्पा मारत होते. एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारला. करकचून ब्रेक बसल्याने चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघाल्या. ठिणग्या मोठ्या होत्या. त्यामुळे स्लीपरला बसलेले लोक घाबरले. कुणी तरी गाडीला आग लागली… आग लागली असं ओरडलं. अफवा पसरली… त्यामुळे गाडीत एकच हल्लकल्लोळ माजला. लोक घाबरून सैरावैरा पळत होते. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या अन् दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या लोकांना उडवलं. हा अपघात अत्यंत भीषण होता. वेदनादायी होता. ही अत्यंत दु:खद घटना आहे, असं संदीप जाधव यांनी सांगितलं.

एक्सप्रेस सुरू

आज दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. एक्सप्रेसच्या चाकांमधून ठिगण्या उडाल्यानेच आगीची अफवा पसरली आणि लोकांनी गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे ही दुर्घटना घडली. आता एक्सप्रेस सुरू झाली आहे. मी पाचोऱ्याच्या पुढे आलो आहे, असं संदीप जाधव यांनी सांगितलं.

जखमींवर उपचार सुरू

पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्यानंतर जखमी प्रवाशांना जळगाव रेल्वे स्थानकाकडे नेण्यात आलं आहे. काही प्रवाशांना पाचोरा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सात ते आठ प्रवाशी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.