AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. (Jalgaon Truck accident kills family)

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा
जळगावातील ट्रक अपघातात १५ मजुरांचा मृत्यू
| Updated on: Feb 15, 2021 | 3:16 PM
Share

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्‍यात किनगावजवळ झालेल्या ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर तालुक्यामधील आभोळा गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 15 मजुरांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. (Jalgaon Truck accident kills family of ten)

पपई नेणारा ट्रक उलटला

रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

ट्रकखाली दबून मजुरांचा मृत्यू

अपघातात काही मजूर ट्रकखाली तर काही मजूर पपईखाली दबले गेले. यामध्ये 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे. सात पुरुष तर सहा महिलांचा आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांच्या वारसांना सरकारकडून मदत

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

मयत मजुरांची नावं
1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार – वय 30 रा. फकीर वाडा रावेर 2) सरफराज कासम तडवी – वय 32 रा. केऱ्हाळा 3) नरेंद्र वामन वाघ – वय 25 रा. आभोडा 4) डिंगबर माधव सपकाळे – वय 55 रा. रावेर 5) दिलदार हुसेन तडवी – वय 20 रा. आभोडा 6) संदीप युवराज भालेराव – वय 25 रा. विवरा 7) अशोक जगन वाघ – वय 40 रा. आभोडा 8) दुर्गाबाई संदीप भालेराव – वय 20 रा. आभोडा 9) गणेश रमेश मोरे – वय 05 वर्ष रा. आभोडा 10) शारदा रमेश मोरे – वय 15 वर्ष रा. आभोडा 11) सागर अशोक वाघ – वय 03 वर्ष रा. आभोडा- 12) संगीता अशोक वाघ – वय 35 रा. आभोडा 13) सुमनबाई शालीक इंगळे – वय 45 रा. आभोडा 14) कमलाबाई रमेश मोरे – वय 45 रा. आभोडा 15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा. आभोडा
(Jalgaon Truck accident kills family of ten)

पंतप्रधान शोकाकुल

महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली

जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून दोन लाखांची मदत

(Jalgaon Truck accident kills family of ten)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.