AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अवकाळीत सगळं पीक फस्त,आणि पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त”; राष्ट्रवादीच्या नेत्याची मंत्र्यांवर टीका

अवकाळी पावसात सगळं पीक फस्त झाले आहे तरीही पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

अवकाळीत सगळं पीक फस्त,आणि पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त; राष्ट्रवादीच्या नेत्याची मंत्र्यांवर टीका
| Updated on: Mar 19, 2023 | 3:06 PM
Share

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच अवकाळी पावसानंतर होणाऱ्या पंचनाम्यांचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली. एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना लक्ष्य केले आहे.

अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही ना सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत आहे ना जिल्ह्याचे पालकमंत्री अथवा नेते त्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे झालेली नुकसान भरपाई देणार का असा सवालही आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीतून फायदा काय मिळणार असा सवाल शेतकरी करत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तरी सरकारकडून अजून कोणतीच घोषणाही करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरीही नुकसान भरपाईचे पंचनामे होणार की नाही असा सवाल करत आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची वाईट अवस्था असल्यामुळे आमदार एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी पक्षातील गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अवकाळी पावसात सगळं पीक फस्त झाले आहे तरीही पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही मंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही नुकसानीबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची याकडे आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.