AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय व्होल्टेज ड्रामा, नाट्यमय घडामोडी, जळगावातलं राजकारण का तापलं?

जळगावातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यामागील कारण म्हणजे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक. या निवडणुकीत महाविकास आघाडीतच नाट्यमय घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या.

हाय व्होल्टेज ड्रामा, नाट्यमय घडामोडी, जळगावातलं राजकारण का तापलं?
| Updated on: May 20, 2023 | 5:36 PM
Share

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon APMC) सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. शामकांत सोनवणे यांनी महाविकास आघाडीच्या संचालकांसोबतच भाजप आणि शिंदे गटाच्या संचालकांची मदत घेऊन सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. सभापतीपदी निवडून आलेले शामकांत सोनवणे यांना 18 पैकी 15 मते मिळाली.

सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून श्यामकांत सोनवणे यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे संचालक लक्ष्मण पाटील हे देखील इच्छुक होते. मात्र, आपल्याला शामकांत सोनवणे यांच्यासह इतर काही संचालकांनी दबाव आणून माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण पाटील यांनी केलाय.

या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये बेबनाव दिसून आला. भाजप आणि शिंदे गटाने खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदी विराजमान केल्याचंही बोलले जात आहे. विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात आपल्या समर्थकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण पाटील यांनी केला.

‘मी मविआचा अधिकृत उमेदवार’

दरम्यान, सभापतीपदी निवडून आलेले शामकांत सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मला मविआ नेते गुलाबराव देवकर आप्पा यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. मी अर्ज दाखल केला. तसेच आमच्यातल्या एकानेही अर्ज भरला तो डमी होता. मला सगळ्यांनी मदत केली. त्यामुळे मी विजयी झालो”, असं शामकांत सोनवणे यांनी सांगितलं.

“लक्ष्मण गंगाराम पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती. उलट त्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली. नेमका वाद झाला ते मला माहिती नाही. मी अँटीचेंबरमध्ये नव्हतो. मी तेव्हा सभागृहात होतो. मी लक्ष्मण पाटील यांच्यापर्यंत गेलोच नाही तर मारहाणीचा विषयच येत नाही”, अशी प्रतिक्रिया शामकांत सोनवणे यांनी दिली.

लक्ष्मण पाटील यांचा मारहाण झाल्याचा आरोप

“मी ठरल्याप्रमाणे अर्ज भरायला गेलो. एकतर आधीच गोकूळ चव्हाण यांनी अर्ज घेतला. त्याचा अर्ज फेकून दिला. या मुलाच्या कानशीलात लागवली. मारहाण केली. अरुन डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. तुमच्या कॅमेऱ्यात हे सगळं कैद झालंय. असं काय, हे कोणतं राजकारण आहे? ही लोकशाही आहे की हुकूमशाही आहे? या हुकूमशाहीच्या हिशोबाने आमच्यासारख्याने जगायचं नाही का?”, असा सवाल लक्ष्मण पाटील यांनी केला.

हे मतदान रद्द झालं पाहिजे आणि पुन्हा मतदानाची तारीख जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण पाटील यांनी केली. तसेच शामकांत बळीकाम सोनवणे आणि दिलीप पाटील या दोघांना हात उचलले. व्हिडीओ आलं आहे. पोलीसही उभे होते, असंही लक्ष्मण पाटील यावेळी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.