AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी उत्पादकांवर अस्मानी संकट; बैलगाड्या भरून केळी जनावरांना पुढे फेकली…

काही शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना, मेंढ्यांना खाण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टर भरभरून केळी फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

केळी उत्पादकांवर अस्मानी संकट; बैलगाड्या भरून केळी जनावरांना पुढे फेकली...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Jun 25, 2023 | 3:36 PM
Share

जळगाव : राज्यातील शेतकरी कधी नैसर्गिक संकटात आहे, तर कधी पडलेल्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकरीराजाच आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कधी पावसाचे संकट तर कधी पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे समस्या उद्धभवत आहेत, त्याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आता केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हातातोंडाशी आलेला घास जनावरांपुढे टाकला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळीला भाव नसल्यामुळे सातत्याने अस्मानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आता केळीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने चांगल्या दर्जाची केळी शेतकऱ्यांनी आता जनावरांपुढे टाकली आहेत.

केळीचे घड जनावरांसमोर

केलेला खर्चही आलेल्या पिकांतून निघत नसल्याने आता शेतकऱ्यांनी आता करायचे काय असा सवालच त्यांनी सरकारला केला आहे. शेतकऱ्यांनी बैलगाड्याच्या बैलगाड्या भरून केळी जनावरा पुढे टाकली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मेंढ्या, गुरे-ढोर बकऱ्यांसमोरही केळीचे घड टाकले आहेत.

केलेला खर्चही निघत नाही

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वारंवार संकट येत असल्याने आता उत्तर महाराष्ट्रातील जळगावचे केळी उत्पादक पाठ फिरवण्याचे चित्र निर्माण झाले आहे. केळी पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने आता केळी उत्पादन घ्यायचे की नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे. केळीला भाव नाही, तर व्यापारी शेतकऱ्याकडून तीनशे-चारशे रुपये क्विंटल दर मागण्यात येत आहे, त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने त्यांच्यावर संकट कोसळत आहे.

शेतकरी हवालदिल

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे आस्मानी संकटात तर दुसरीकडे केळीला भाव नसल्याने कापणीवर आलेले केळीला शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले आहे.

केळी उत्पादनाकडे ‘पाठ’

तर काही शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना, मेंढ्यांना खाण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टर भरभरून केळी फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर महाराष्ट्रातील जळगावचे केळी उत्पादक केळी उत्पादनाकडे पाठ फिरवण्याचे चित्र यावरून निर्माण झाले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...