AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अरे मिंध्या आम्ही दिलेलं मत वापस कर”; शिवसेनेच्या आमदारान संजय राऊत यांना डिवचले

कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे त्याच प्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती.

अरे  मिंध्या आम्ही दिलेलं मत वापस कर; शिवसेनेच्या आमदारान संजय राऊत यांना डिवचले
| Updated on: Mar 26, 2023 | 10:30 PM
Share

जळगाव : कोण आला रे कोण शिवसेनेचा वाघ आला म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालेगावत जंगी स्वागत करण्यात आले. ठाकरे गटाच्या मालेगावमधील सभेत ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. याच खासदार संजय राऊत यांनीही आमदार गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे यांच्यावर जहरी टीका करत कांद्यासारखे गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचे आहे अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती. तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आमदार सुहास कांदे यांच्यावर खोक्यावरून टीका केली होती. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मालेगावमधील सभेत आमदार गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता नाशिक उत्तर महाराष्ट्रासह इतर ठिकाणचे राजकारण तापले आहे.

त्यामुळे आता मालेगावची सभा झाल्यानंतर शिवसेनेतील नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना माझ्यावर त्यांनी टीका कार करावी लागते कारण त्याचा अर्थ मी छोटा माणूस नाही. त्यामुळेच संजय राऊत यांच्यासारख्या माणसांकडून आपल्यावर टीका केली जाते असा टोला त्यांनी संजय राऊत यांंना लगावला आहे.

ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडाला दगड मारला जातो. त्यामुळे संजय राऊतलाही माहिती आहे मला फळं अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी टीका करताना त्यांच्यावर राज्यसभेवर आमच्यामुळे निवडून गेल्याचे सांगत ते म्हणाले की, अरे मिंध्या पाहिले आम्ही दिलेलं मत वापस कर मग गुलाबराव पाटलांवर टीका कर असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे त्याच प्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती.

त्यावर गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, मला कांद्याप्रमाणे रस्त्यावर फेकण्याआधी आम्ही तुम्हाला केलेली मत आधी आम्हाला परत कर नाही तर तोच कांदा आता तुझ्या तोंडावर हाणून मारेल असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.