AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, ‘जालना सोने का पालना’ थीम काय ?

जालना सोने का पालना या संकल्पनेवर समृद्धी महामार्गावरील पुलाचं नक्षीकाम सुरु आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना येथील वैभवाची जाणीव करून देण्यासाठी हे काम केलं जातंय.

समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, 'जालना सोने का पालना' थीम काय ?
| Updated on: Mar 04, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः नागपूर ते मुंबई (Nagpur-Mumbai) या समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Highway) काम संपूर्ण मराठवाड्यात प्रगतीपथावर आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम, पुलांची मजबुती, बोगद्यांची देखणी व्यवस्था अतिशय लक्षवेधी ठरत आहे. जालन्यातून जाणाऱ्या (Jalna Samruddhi Mahamarg) या मार्गावरील 20 मीटर पुलावरही अत्यंत आकर्षक काम सुरु आहे. या पुलावर सोनेरी रंगातील खांब उभारून त्याव अत्यंत सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील 12 कारागीर दोन महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. जालन्यातून या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना इथल्या वैभवाची ओळख करून देण्यासाठी ही सजावट करण्यात येत आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन, रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

Jalna Samruddhi Highway

राजेशाही सजावटीचा पूल नेमका कुठे?

समृद्धी महामार्गाचा जालना शहरातून जो रस्ता जातोय, तेथे 20 मीटर पुलावर मोठे खांब उभारून नक्षीदार जाळ्या बसवून या पुलाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी तीन केबिन, डिजिटल यंत्रणा बसवण्यात आली आहे. टोलनाक्याच्या काही अंतरावर गेल्यानंतर पुलाच्या ठिकाणी नक्षीकाम सुरु आहे. येथील पुलावर जीआरसी अर्थात ग्लास फायबर प्रचलित काँक्रीट साहित्य वापरून हे डिझाइन सुरु आहे.

Jalna Samruddhi Highwway

जालना सोने का पालना थीम काय?

जालना सोने का पालना या संकल्पनेवर समृद्धी महामार्गावरील पुलाचं नक्षीकाम सुरु आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना येथील वैभवाची जाणीव करून देण्यासाठी हे काम केलं जातंय. महाराष्ट्रात मोठ्या व्यापारी बाजारपेठेसाठी जालन्याची ख्याती आहे. असं म्हणतात की, रामायण काळात जालन्याचं नाव जनकपुरी असं होतं. जालेरायाने ही व्यापारी पेठ वसवली. तिचं नाव पुढे जाल्हनपूर पडलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन जालना हे नाव तयार झालं. निजामाच्या काळात जालना शहराचा संपूर्ण देशाशी संबंध आला आणि व्यापार धंद्यांशी इथली संस्कृती जोडली गेली. आज तर बियाणांपासून थेट स्टील उद्योगांपर्यंत जालना संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जालना सोने का पालना ही शहराची ओळख जपण्यासाठी समृद्धी महामार्गावर विशेष मेहनत घेऊन ही डिझाइन साकारली जातेय.

Jalna Samruddhi Highwway

इतर बातम्या-

World Birth Defects Day: जन्मजात विकार असल्यामुळे जगातील लाखो नवजात बालकांचा मृत्यू होतो, त्यावर हे आहेत उपाय

Up Elections 2022 : उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी दिग्गजांकडून प्रचार, मोदी-योगींची जोडी गड राखणार?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.