AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपोषणाचा सातवा दिवस, आज तब्येत कशी?; मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं…

Manoj Jarage Patil on on his Helth : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळते आहे. अशात आज त्यांची तब्येत कशी आहे?; मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्यांनी काय म्हटलंय? पाहा...

उपोषणाचा सातवा दिवस, आज तब्येत कशी?; मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं...
manoj jarange patil
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 31, 2023 | 12:17 PM
Share

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. काल उपस्थितांना संबोधित करण्यासाठी उभे राहत होते. पण तितक्यात ते स्टेजवरच कोसळले. परवा दिवशी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचे हात थरथरत होते. पुढे त्यांच्या हातून माईकही खाली पडला. अशा सगळ्यात आज आता मनोज जरांगे यांची तब्येत कशी आहे? यावर स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. ते माध्यमांशी बोलत होते.

कालपर्यंत माझ्यात त्राण नव्हता पण समाजाने मला विनंती केल्यानं मी पाणी पितोय. आता जरा बरं वाटतंय. त्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. अर्धवट आरक्षण दिलं तर मला सांगू नका. अर्धवट कसं काय. मराठवाड्यातील भाऊ तुमचे आहेत. महाराष्ट्रातील तुमचे नाही का. मराठवाड्यातील माझे आहेत. मग पश्चिम महाराष्ट्रातील माझे नाही का. त्यामुळे सरसकट द्या. अर्धवट भूमिका नकोच. कुठूनही पुरावे घ्या. पण आरक्षण महाराष्ट्रभर द्या, अशी पुनर्मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

आमदार मुंबईकडे गेले आहेत. त्यांचं योगदान मराठा समाज विसरणार नाही. त्यांनी राजीनामा का दिले माहीत नाही. त्यांना आम्ही सांगितलं नव्हतं. त्याने काय फायदा होणरा आणि तोटा होईल माहीत नाही. आमदारकी खासदारकी असेल तर ते आळवू तरी रागतील. राजीनामे दिले तर .ते रिकामे बसतील डांबरा सारखे. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे. हे फक्त तुटूनच पडले आहेत. योग्य असेल तर द्या राजीनामा. १० ते १५ दिवसांसाठी राजीनामे दिले तर ठिक. पण त्याचा समाजावर परिणाम होऊ नये, असं म्हणत राजकीय नेत्याच्या राजीनामा देण्यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.

सर्व आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सदऱ्याला धरून बसा. आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी गट तयार करावी. आणि मुंबई सोडू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचं दार सोडू नका. त्यांच्या पाया पडा. आरक्षण मिळवून घ्या, असंही जरांगे पाटील म्हणालेत.

Follow Us
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....