AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj jarange patil | सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Manoj jarange patil | मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात मनोज जरांगे पाटील यांना, सरकारला थोडा वेळ द्या, असं आवाहन करण्यात आलं. अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

Manoj jarange patil | सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?
manoj jarange patil
| Updated on: Nov 01, 2023 | 2:42 PM
Share

जालना : “सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे?. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “गोरगरीबाच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याच काम सरकारकडून सुरु आहे. ते हसण्यावारी नेतायत. आरक्षण द्या अरे-तुरे बोलण बंद करतो. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे” असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. “तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनात काय आहे? हे कळू दे. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट नाट वदवून घेऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही. वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का?. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. “चर्चा करायची हे आंदोलनाला बसण्याआधी का नाही सांगितलं?. आठ दिवस रक्त जाळल्यानंतर यांना जाग आली. पण मी माझ्या समजासाठी तयार आहे. मराठा समाजाला गरम केलं जातं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “यांना का आणि कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

…तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद होईल

“देवेंद्र फडणवीस यांनी इथे यावं, मराठे त्यांना अजिबात अडवणार नाहीत. मी चर्चेसाठी बोलावल पण ते आले नाहीत. आम्ही मनावर घेतलं, तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांनी आज संध्याकाळपासून पाणी बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या समाजाच्या विनंतीला मान देऊन पाणी पितायत. सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती ढासळली होती. पण आता पाणी पिल्यामुळे प्रकृती थोडी बरी आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.