AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; अशोक चव्हाण यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा; अशोक चव्हाण यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
अशोक चव्हाण Image Credit source: social media
| Updated on: Feb 07, 2023 | 3:34 PM
Share

जालना : सत्यजित तांबे यांच्या प्रकरणापासून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद निर्माण झाला. बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांची बाजू लावून धरली. महिनाभरानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात पत्र बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडं पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, आम्हाला आताचं कळालं. आम्हीसुद्धा पुण्याहून कैलास गोरंटेवारच्या घरी जे लग्न आहे त्यासाठी आलो आहे. येथे आल्यानंतर ही बातमी कानावर आली.

थोरात संयमी आणि ज्येष्ठ नेते

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. त्यामुळं यामागचं कारण हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही. बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

त्यांनी या पदाचा दिला राजीनामा

अशोक चव्हाण म्हणाले, सकाळी आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती नव्हती.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी येणार

महाराष्ट्राचे प्रभारी हा वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पक्ष मजबूत होण्यासाठी जे-जे करावं लागेल ते मी आणि विश्वजित कदम आम्ही दोघेही मिळून करू, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

असा सुरू झाला वाद

यापूर्वी बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांच्याकडून पदभार काढून नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला होता. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पुन्हा नाराजी उफाळून आली.

सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला. ते निवडूनही आले. पण, सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आता हा वाद मिटविण्यात काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी कितीपत यशस्वी ठरतात, हे येत्या काही दिवसात दिसणार आहे. तोपर्यंत काँग्रेसमध्ये काय हालचाली घडतात हे पाहावं लागेल.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.