AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

उज्ज्वल निकम म्हणाले की, शाळा असेल किंवा कॉलेज असेल इथे धार्मिक प्रवृत्ती वाढू द्यायच्यात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण होत होता. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा हक्क आहे, पण ज्यावेळा शिक्षण किंवा काही उद्योग करतो असतो, त्यावेळेला नियमांच्या चौकटीत वागले पाहिजे. हा देखील एक भारतीय घटनेचा महत्त्वाचा भाग स्पष्ट होतो.

Video | 'अभिव्यक्ती' म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत
उज्ज्वल निकम.
| Updated on: Mar 15, 2022 | 12:09 PM
Share

हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) आज सोमवारी 15 मार्च रोजी दिला. सोबतच या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयाचे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्वागत केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नाही. त्यामुळे स्वैराचार बोकाळेल. माझ्या मते या निकालाचे चांगले निश्चित परिणाम दिसतील. कुठल्याही राजकीय पक्षाने कोण जिंकले, कोण हरले हे न पाहता, याचे भांडवल न करू नये. भारतीय लोकशाही कशा रितीने बलवान होईल याकडे कटाक्ष द्यावा, असे आवाहनही निकम यांनी यावेळी केले.

अमर्याद स्वातंत्र्यामुळे स्वैराचार…

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, भारतीय घटनेनुसार भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क मिळाला आहे, त्याचा बऱ्याच वेळा काही लोक गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना निश्चित या निकालामुळे समजेल की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अमर्याद स्वातंत्र्य आहे. कारण अमर्याद स्वातंत्र्यामुळे स्वैराचार निर्माण होऊ शकतो. ही बाब देखील या निकालातून स्पष्ट करण्यात आली आहे.

तर भविष्यात लोकशाहीला धोका…

उज्ज्व निकम म्हणाले की, दुसरी महत्त्वाचा बाब म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास केला आहे. कारण या देशात अनेक जाती, धर्माचे लोक एकत्र राहतात. आणि प्रत्येक जण आपल्या राहण्यामध्ये, वागण्यामध्ये धार्मिक गोष्टींचा पगडा मनात ठेवून वागायला लागला, तर लोकशाहीला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. हे जाणूनच आपल्या घटनेचा वरचष्मा कायम ठेवला आहे.

नियमांच्या चौकटीत वागावे…

उज्ज्वल निकम म्हणाले की, शाळा असेल किंवा कॉलेज असेल इथे धार्मिक प्रवृत्ती वाढू द्यायच्यात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण होत होता. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा हक्क आहे, पण ज्यावेळा शिक्षण किंवा काही उद्योग करतो असतो, त्यावेळेला नियमांच्या चौकटीत वागले पाहिजे. हा देखील एक भारतीय घटनेचा महत्त्वाचा भाग स्पष्ट होतो. माझ्या मते या निकालाचे चांगले निश्चित परिणाम दिसतील. कुठल्याही राजकीय पक्षाने कोण जिंकले, कोण हरले हा प्रश्न महत्त्वाचा नाही. याचे भांडवल न करता भारतीय लोकशाही कशा रितीने बलवान होईल याकडे कटाक्ष दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.