AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाथाभाऊंच्या मनात… तर मीही स्वत:ला अटक करून घेतो; गिरीश महाजन असं का म्हणाले ?

जामनेर येथील तरुणाच्या हत्येच्या प्रकरणावरून भाजप नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. खडसे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केल्यानंतर महाजन यांनी त्यांना खोचक टोला लगावला. महाजन यांनी इम्तियाज जलील यांच्या मांसाहार जेवणाबाबतही प्रतिक्रिया दिली. या वादात रक्षा खडसे यांनीही प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. खडसे कुटुंबावरील आरोप आणि त्यांच्यावर होणारे आंदोलन याबाबतही चर्चा रंगली आहे.

नाथाभाऊंच्या मनात... तर मीही स्वत:ला अटक करून घेतो; गिरीश महाजन असं का म्हणाले ?
गिरीश महाजन - एकनाथ खडसेImage Credit source: social media
| Updated on: Aug 16, 2025 | 11:15 AM
Share

एकेकाळी भाजपात असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, मात्र मध्यंतरी नाथाभाऊन पुन्हा भाजपात येण्याचा प्रयत्न केला. तशी घोषणाही त्यांनी केली होती, मात्र त्यांचा भाजपचा अधिकृत प्रवेश अद्याप काही पार पडलेला नाही. याच भाजपाचे नेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नात असून त्यांचे सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी असं विधान केलं होतं की जामनेर येथील तरूणाच्या हत्या प्रकरणात खरे आरोपी पकडले जावेत, असं ते म्हणाले होते.

आता याच मुद्यावरून भाजप नेते, गिरीश महाजन यांनी जे विधान केलं त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही,त्यांना कोणता संशय असेल तर ते सांगतील त्यांना अटक केली जाईल. माझंही नाव ते घेत असतील मीही पोलिसाना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार, असं वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना खोचक टोला लावला आहे. जळगावमध्ये ते बोलत होते. जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत नऊ लोकांना अटक केली असून पोलिस तपास सुरू आहे, असंही ते म्हणाले. मात्र महजानांच्या या विधानामुळे आता त्यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून या टोल्याला खडसे काय प्रत्युत्तर देतात याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.

इम्तियाज जलील यांचं वागणं चुकीचं

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक महापालिकांनी मटण, मांस विक्रीवर बंदी घातली होती, दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र एआयएमआयएमचे नेते यांनी या बंदीचा विरोध दर्शवत घरी मांसाहार शिजवला होता. यावरूनही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मांस विक्रीवर बंदी असतांना इम्तियाज जलील यांनी मांसाहारी जेवण करून सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करणं, हे चुकीचे असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटल आहे.

रक्षा खडसे यांनाही लगावला टोला

खडसे कुटुंबातील जावई सध्या पोलिस कोठडीत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. खडसे कुटुंबावर होत असलेले आरोप, तसेच एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध होत असलेले आंदोलन यामुळे मला वेदना होत आहेत, नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासावर बोलावे, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले होते. मात्र या विषयावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांनी त्यांच्या घरी सल्ला द्यावा, असे प्रत्युत्तर दिलं असून वातावरण आणखीनच तापण्याची चिन्ह आहेत

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच