AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला आयोजक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे आक्रमक

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबई येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. खारघर येथे सेंट्रल पार्कवरील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मृतांचा आकडा लपवला जातोय, 12 मृत्यूला आयोजक जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवे आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2023 | 1:49 PM
Share

मुंबई : नवी मुंबई खारघर (Kharghar) येथील कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जातोय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. सरकारने सध्या तरी या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. अंबादास दानवे यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 12 लोकांच्या जीवाला सांस्कृतिक विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असं वक्तव्य दानवे यांनी केलंय.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.

12 लोकांचा जीव जाण्याला ‘हे’ जबाबदार

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मी आदर करतो. मात्र त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना राज्य सरकारने येणाऱ्या श्री सदस्यांसाठी केलेली उपाययोजना अत्यंत अपुरी होती. त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झालाय. सरकारने सध्या 12 जणांचा आकडा सांगितलाय. हा आकडा लपवला जातोय, अशी चर्चा आहे. कुणी म्हणतंय, 20 पर्यंत हा आकडा आहे. मी सरकारला आवाहन करेल, खरी बाब समोर येऊ द्या. 12 लोकांच्या जाण्याला सांस्कृतिक विभागातील संबंधिक अधिकारी, सचिव दोषी आहेत, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या हस्ते पुरस्कार का?

दरम्यान, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह्याच्या हस्ते पुरस्कार देण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार का दिला नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. या घटनेची जबाबदारी घेत संबंधित मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक, काँग्रेस मवाळ?

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबई येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. खारघर येथे सेंट्रल पार्कवरील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात उपस्थित 50 हून जास्त जणांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 12  जणांचा मृत्यू झालाय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आक्रमक झाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसने मात्र मवाळ धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय. मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, याची पुनरावृत्ती होऊ नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......