AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, ‘त्या’ लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, 'त्या' लाभार्थी महिलांना मिळणार मोठा दिलासा
ladki bahin yojana Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 7:20 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. परंतु अनेक महिला या पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर या योजनेचा लाभ हा फक्त पात्र महिलांनाच मिळावा या उद्देशाने सरकारने या योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया लागू केली. आता केवायसीची मुदत संपली आहे.

ज्या महिलांनी वेळेत केवायसी केली नाही, किंवा ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. परंतु अशा देखील काही महिला आहेत, ज्यांची केवायीस प्रक्रिया देखील झाली आहे, त्या पात्र देखील आहेत, मात्र त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी आता आमदार बच्चू कडू मैदानात उतरणार आहेत. ज्या महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, मात्र त्यांचे पैसे मिळत नाहीत, अशा महिलांना तातडीने पैसे मिळाले पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तसचे त्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ते गोंदियामध्ये बोलत होते.

अनेक लाडक्या बहिणींचे फॉर्म हे केवायसीच्या नावावर बाद करण्यात आले आहेत.  यावर बोलताना शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांनी सारवासारव करत सांगितले की अनेक ज्या महिला खरोखर पात्र आहे, त्यांचे फॉर्म मंजूर करण्यात आले आहेत.  ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांनी एफीडेव्हिट किंवा विविध कारणांनी त्यांना वारंवार मुदत वाढ देऊनही त्यांनी आवश्यक ती कागदपत्र जमा केली नाहीत, अशांचे फॉर्म बाद करण्यात आले आहेत.  जे गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेत होते अशा महिलांचे फॉर्म देखील बाद करण्यात आले आहेत. मात्र सर्व लाडक्या पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळतच राहणार आहे. यावर बोलताना बच्चू कडू यांनी ज्या महिला पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही, अशा महिलांचे फॉर्म लवकरात लवकर मंजूर करावे असं म्हटलं आहे, तसेच त्यांनी यासाठी सरकारला 30 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, त्यानंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात