AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar Passed Away : लतादीदी परमेश्वरी अवतार, एका युगाचा अंत, मन सुन्न झालंय, भाजप नेते दरेकरांची प्रतिक्रिया

लतादीदी परमेश्वरी अवतार आहेत. त्यांनी जगाच्या पाठीवर देशाचे नाव मोठे केले, अशी भावुक प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

Lata Mangeshkar Passed Away : लतादीदी परमेश्वरी अवतार, एका युगाचा अंत, मन सुन्न झालंय, भाजप नेते दरेकरांची प्रतिक्रिया
लता मंगेशकर
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 10:25 AM
Share

नाशिकः लतादीदींच्या (Lata Mangeshkar) आवाजाने प्रत्येकावर गारूड केले. त्यांनी गायिलेल्या प्रत्येक गाणे सुरू झाले की, आपसुकच मान डोलावली जाते. मग तो साहित्यिक असो, चित्रकार असो, क्रीडापटू असो की राजकारणी. त्यामुळेच आज भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) लतादीदी परमेश्वरी अवतार आहेत. त्यांनी जगाच्या पाठीवर देशाचे नाव मोठे केले, अशी भावुक प्रतिक्रिया दिली. जनतेच्या आशीर्वादाने त्या लवकर बऱ्या होतील. मी देखील प्रार्थना करतो, असे दरेकर म्हणाले. मात्र, पुढल्या काही मिनिटांत लतादीदींच्या निधनाची वार्ता येऊन धडकली. त्यामुळे दरेकरही भावुक झाले. त्यानंतर ते म्हणाले की, लतादीदींचे जाणे ही देशाच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना आहे. लतादीदी नावाच्या युगाचा अंत झालाय. देशाची कधी भरून न निघणारी ही पोकळीय. संगीत क्षेत्रातील या वार्तेने मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हल्ला पूर्वनियोजित

दरम्यान, तत्पूर्वी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडलाय. नितेश राणे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या अविर्भावात सरकार काम करत आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालीय. मात्र, परिवहन मंत्री एसटी प्रश्न सोडवू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. दरेकर पुढे म्हणाले की, सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होतं. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर सरकार जबाबदार

दरेकर म्हणाले, भाजपने उद्या जर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले, तर त्याला सरकार जवाबदार असेल. राहिलेल्या शिवसैनिकांवर देखील कारवाई करावी. देशात लोकशाही आहे. सोमय्या ज्या पद्धतीने पुराव्या सहित प्रकरण बाहेर काढत आहेत, याचा अर्थ सोमय्या यांनी केलेले आरोप खरे आहेत. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला. हल्ला करणारे शिवसैनिक आहेत. त्यांना आदेश कोण देते हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोप त्यांनी केला. अजित पवार आणि उदयन राजे यांची भेट विकासकामांसाठी होते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

इतर बातम्याः

Nashik Murder Mystery| डॉ. सुवर्णा वाजेंना पतीनेच थंड डोक्याने जिवंत का जाळले, भीषण खुनाचे गूढ अखेर उकलले!

प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतले, निथळता ड्रेस गॅसवर धरला; क्रूरकर्मा प्रियकराला जन्मठेप, भयंकर हत्याकांडाची बित्तमबातमी

Nashik | आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी शाळेत 1 लीचे प्रवेश सुरू; काय आहेत नियम, अटी, योजना?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.