AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली

राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली (Water increase in Maharashtra dam) आहेत.

Maharashtra Dam : जून, जुलैमधील पावसामुळे राज्यातील सर्व धरणं 44.8 टक्के भरली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 06, 2020 | 5:17 PM
Share

नागपूर : राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं मिळून एकूण 44.8 टक्के भरली (Water increase in Maharashtra dam) आहेत. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यासोबतच धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे (Water increase in Maharashtra dam).

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी सर्व धरणं मिळून 44.8 टक्के भरली आहेत. कोकण विभागातील धरणांमध्ये सध्या सर्वाधीक म्हणजे 58.9 टक्के पाणीसाठा आहे, तर त्यापाठोपाठ नागपूर विभागातील धरणं 52.82 टक्के भरली आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागाची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे, या तिन्ही विभागात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणं कितीतरी पट जास्त भरली आहेत.

राज्यात कुठल्या विभागातील धरणं किती भरली

विभाग                      धरणातील पाणीसाठा

अमरावती                      36.96 टक्के

कोकण                            58.9 टक्के

नागपूर                           52.82 टक्के

नाशिक                           37.87 टक्के

पुणे                                 37.87 टक्के

औरंगाबाद                      42.21 टक्के

राज्यात मोठे, मध्यम आणि लघू धरणांमध्ये मिळून सध्या 44.8 टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यातील मोठी धरणं 50 टक्के भरली आहेत. त्यापाठोपाठ मध्यम धरणांमध्येही 43 टक्के पाणीसाठा सध्या आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Rain | बळीराजा सुखावला, महाराष्ट्रात सरासरीच्या 97.7 टक्के पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.