AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : निष्काळजीपणा की भोंगळ कारभार; बारामती विमानतळाचा कारभार कोण पाहतं? अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मोठी माहिती समोर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातानंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, एअर ट्रॅफिक कंट्रोलचा अभाव आणि धावपट्टीवरील तांत्रिक त्रुटींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Crash : निष्काळजीपणा की भोंगळ कारभार; बारामती विमानतळाचा कारभार कोण पाहतं? अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मोठी माहिती समोर
Ajit Pawar Baramati Airport
| Updated on: Jan 29, 2026 | 1:08 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याजवळील बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या भीषण घटनेनंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि तांत्रिक त्रुटींवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकारण्यांची सातत्याने वर्दळ असलेल्या या विमानतळाकडे सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी ८.१० च्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. अजित पवारांचे विमान हे बारामती विमानतळाजवळ पोहोचले, पण बुधवारी लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ ३ किलोमीटर इतकी होती. यामुळे वैमानिकाने सुरुवातीचे लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत वळवण्याचा (Go-around) प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर विमान कंपनीसोबतच बारामती विमानतळाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विमानतळाचे प्रशासन आणि अनियंत्रित कारभार

बारामती विमानतळ हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमानुसार अनियंत्रित (Uncontrolled) श्रेणीत येते. या विमानतळाच्या कारभाराबाबत आत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) मालकीचे असून बारामती विमानतळ लिमिटेड (BAL) द्वारे चालवले जाते. या विमानतळावर नियमित एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणा नाही. त्याऐवजी, विमानतळ परिसरात असलेल्या खाजगी पायलट ट्रेनिंग अकादमींचे प्रशिक्षक किंवा विद्यार्थीच रेडिओवरून विमानांना सूचना देतात.

तज्ज्ञांच्या मते, जर या धावपट्टीवर ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) असती, तर कमी दृश्यमानतेतही वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळाले असते आणि हा अपघात टाळता आला असता. हे विमानतळ साधारण ४५० एकरवर पसरलेले असून त्याची धावपट्टी ७,७१० फूट लांबीची आहे. या ठिकाणी अनेक राजकीय नेते चार्टर विमानाने येत असतात. २००९ मध्ये हे विमानतळ विकासासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले होते, परंतु प्रगती न झाल्याने २०२५ मध्ये एमआयडीसीने ते पुन्हा ताब्यात घेतले. सध्या येथे केवळ दोन केबिन आणि एक खोली एवढीच इमारत उपलब्ध आहे.

भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर

आता या भीषण अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) तातडीने आपली एक विशेष टीम बारामती विमानतळावर तैनात केली आहे. आता येथील हवाई वाहतूक नियंत्रण आणि हवामान खात्याने याची जबाबदारी घेतली आहे. सध्या हवाई दलाचे जवान हे विमानतळ सांभाळत आहेत, जेणेकरून पुढील उड्डाणे सुरक्षित होतील. या घटनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विमानतळ, धावपट्ट्या आणि तेथील सुरक्षा यंत्रणा किती रामभरोसे आहेत, याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड