AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फूड अँन्ड ड्रग्ज विभागात ड्रग्ज इंस्पेक्टर ग्रुप बी या पदाच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्दImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 1:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. नीटसह इतर काही परीक्षेचे पेपर लीक झाल्याची प्रकरण समोर येत आहेत. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान त्यावरून देशभरात वातावरण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फूड अँन्ड ड्रग्ज विभागात ड्रग्ज इंस्पेक्टर ग्रुप बी या पदाच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरमध्ये अनियमितता आणि पेपर लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू करण्यात आला होता. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता. त्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ड्रग इंस्पेक्टर ग्रुप ब भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने 29 जुलाई 2025 जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानतंर मार्च 2026 ला चाळणी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा राज्यातील सहा विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. मात्र या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा तसेच पेपर लीक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच पोहोचल्याचा आरोप होत होता. विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या संदर्भात 27 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं आढळून आलं की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता, आणि त्याला त्याचा या परीक्षेत फायदा देखील झाला.

त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगने घेतला आहे. दरम्यान आता ही परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात लवकरच अधिकृत सूचना जारी केली जाणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची गरज नाहीये, तसेच त्यांना कोणतंही शुल्क भरण्याची गरज नाहीये.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय