AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे

आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ज्यांना आंतरजायीत विवाह करण्याची इच्छा आहे, अशा अनेकांना फायदा होऊ शकतो. तसेच इतरही काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 1:25 PM
Share

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यातील महिलांसाठी विशेष करून अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमधील ज्या महिला आंतरजातीय विवाह करतील त्यांना बिहार सरकारकडून 1.25 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकारकडून देखील 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ आता ज्या महिला आंतरजातीय विवाह करणार आहेत, त्यांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी महिलांच्या रोजगारामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम देखील सुरू केले आहेत.

महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम

महिलांच्या आरोग्यसाठी बिहार सरकारकडून आता महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून अॅनिमिया मुक्त बिहार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिला आणि बालकांचं आरोग्य सुधारावं या उद्देशातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचं यावेळी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे. या अभियानांतर्गत गर्भवती माता, लहान मुलं आणि महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येणार आहे, तसेच त्यांना आवश्यकतेनुसार उपचाराच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती बिहार सरकारने दिली आहे. हे विशेष अभियान 25 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या काळात राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बिहारमधील 1 कोटी 20 लाख 82 हजार 500 महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

एवढंच नाही तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण करतील त्यांना देखील प्रोत्साहन म्हणून बिहार सरकारच्या वतीने तीस हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा देखील सरकारच्या वतीने करण्यात आली आहे, स्थानिक प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय