AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रानं जाहीर केलेली मदत 2020 सालची, पूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा – कृषीमंत्री

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले.

केंद्रानं जाहीर केलेली मदत 2020 सालची, पूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा - कृषीमंत्री
दादाजी भुसे
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत 2020 सालची आहे. जूनते ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी आम्ही 3 हजार 701 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने काल त्यातील 701 कोटी रुपये आता दिले आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. 2020 चे उरलेले 3 हजार कोरी लवकर मिळतील अशी अपेक्षाही दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. (Dada Bhuse expects early help from the central government for flood victims)

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले. या महापुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा तिथे जाण्यात अडचणी येत आहे. तिथले पंचनामे होणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे, असं दादा भुसे म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये मंजूर

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल

तळीयेमध्ये 25 वर्षांच्या आतील 27 जणांचा मृत्यू, 11 मुलींचा समावेश, नातेवाईक हळहळले

Dada Bhuse expects early help from the central government for flood victims

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.