केंद्रानं जाहीर केलेली मदत 2020 सालची, पूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा – कृषीमंत्री
आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले.
मुंबई : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत 2020 सालची आहे. जूनते ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी आम्ही 3 हजार 701 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने काल त्यातील 701 कोटी रुपये आता दिले आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. 2020 चे उरलेले 3 हजार कोरी लवकर मिळतील अशी अपेक्षाही दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे. (Dada Bhuse expects early help from the central government for flood victims)
आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले. या महापुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा तिथे जाण्यात अडचणी येत आहे. तिथले पंचनामे होणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे, असं दादा भुसे म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये मंजूर
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही मदत जाहीर केली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 701 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ही मदत पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत दिली जाईल, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या माहितीच्या आधारे अहवाल, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारनं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जी माहिती केंद्राला दिली गेली. केंद्रानं आतंर मंत्रालयीन समिती बनवली, समितीनं राज्यातील अधिकाऱ्यासोबत दौरा केला. तो दौरा केल्यानंतर अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात आला. तो अहवाल मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रासाठी 701 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाल्याचं नरेंद्र तोमर म्हणाले आहेत.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 July 2021https://t.co/eXzgMqT0s2 | #4Minutes24Headlines | #SharadPawar | #UddhavThackeray | #GopichandPadalkar | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
संबंधित बातम्या :
पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल : राज्यपाल
तळीयेमध्ये 25 वर्षांच्या आतील 27 जणांचा मृत्यू, 11 मुलींचा समावेश, नातेवाईक हळहळले
Dada Bhuse expects early help from the central government for flood victims