AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर तरी लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? सामनातून सवाल

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२६ मध्ये तीन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी, मतदार याद्या, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर तरी लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? सामनातून सवाल
| Updated on: Sep 18, 2025 | 9:04 AM
Share

महाराष्ट्रातील महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहे. या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहेत. त्यानुसार मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये घेतल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात होईल, असे म्हटले जात आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर तरी लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. यासोबतच या अग्रलेखातून न्यायव्यवस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात डेडलाइन दिली आहे. ३१ जानेवारी २०२६ ही डेडलाईन योग्य असून त्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाचे कान उपटल्याबद्दल जनतेने न्यायव्यवस्थेचे आभार मानले पाहिजेत, असे सामनात म्हटले आहे.

या मंडळींचे हेच कारस्थान आहे का?

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलेच झाले, परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थाने ‘लोकशाही’ची प्रतिष्ठापना होईल का? विधानसभेप्रमाणे या निवडणुकांतही मतांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री? ईव्हीएमच्या कमतरतेचे कारण पुढे करीत मध्य प्रदेशातून 25 हजार ईव्हीएम येथे आणण्यामागे या मंडळींचे हेच कारस्थान आहे का? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात होत्या. प्रभाग रचना, ईव्हीएमची कमतरता, शाळांच्या परीक्षा यांसारखी कारणे देऊन निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही ‘पुंगी’ तोडून टाकली. निवडणुका लांबवण्यामागे सत्ताधाऱ्यांची पराभवाची भीती हेच मुख्य कारण होते. ‘योग्य मुहूर्ता’ची वाट पाहून निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. याच काळात प्रशासकांच्या माध्यमातून स्थानिक संस्थांची लूट सुरू होती, असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

मतचोरी आणि मतदार याद्यांचे घोळ होण्याची भीती

न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केला असला, तरी या संस्थांवर खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे या स्थानिक निवडणुकांमध्येही मतचोरी आणि मतदार याद्यांचे घोळ होण्याची भीती आहे. मध्य प्रदेशातून २५ हजार ईव्हीएम आणण्यामागे काही ‘कारस्थान’ आहे का, असा प्रश्न विचारला आहे. तसेच, व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर न करण्याचा निर्णय याच उद्देशाने घेतला आहे का, अशी शंकाही उपस्थित केली आहे.

फडणवीस-मिंधे मंडळींचे शेपूट वाकडे

मुंबईसह राज्यातील 27 महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांवर केवळ राज्यकर्त्यांच्या मनमानीमुळे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून जनतेची सत्ता नाही. सगळा कारभार सरकार नियुक्त प्रशासकांमार्फत सुरू आहे. या निवडणुकांचा विषय आला की, काहीतरी कारणे सांगायची, ती संपली की नव्या सबबी पुढे करून निवडणुका पुढे ढकलत राहायच्या. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेच या निवडणुकांचे वेळापत्रक देऊनही फडणवीस-मिंधे मंडळींचे शेपूट वाकडेच होते. या निवडणुका लांबविण्यासाठी प्रभाग रचनेची सबब चालणार नाही. हे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. आता म्हणे, ‘‘न्यायालयाने दिलेल्या डेडलाइननुसार निवडणूक आयोग ही निवडणूक प्रक्रिया पार पाडेल,’’ असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तीन वर्षे निवडणुका लांबविणारे तुम्ही ‘डेडलाइन’च्या गोष्टी कुठल्या तोंडाने करीत आहात? असा सवाल सामनाने विचारले आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....