AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली

भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा अशी भूमिका भाजपनं मांडली आहे.

Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
| Updated on: Apr 10, 2021 | 7:02 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा अशी भूमिका भाजपनं मांडली आहे. (Reduce MLA funds and give the money to the workers- Chandrakant Patil)

‘आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना मदत द्या’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

‘निर्बंध हवे, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्या’

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

जनतेला मानसिक दिलासा देण्याची गरज- दरेकर

राज्यातील जनतेला सध्या मानसिक दिलासा देण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वय आवश्यक आहे. एकमेकांची उणीदुणी निघत असतात पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ, असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये एकमत नाही. मुंबईत नाना पटोले यांचे लॉकडाऊन विरोधातील पोस्टर्स लावले जात आहे. तर इथे बाळासाहेब थोरात कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील असं सांगत आहे, असंही दरेकर म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा असेल तर आधी उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा, अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी आग्रही, काँग्रेसची भूमिका काय?

रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज: राजेश टोपे

Reduce MLA funds and give the money to the workers- Chandrakant Patil

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.