AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सह-पालकमंत्री काय आहे? मुंबईला गेल्यावर समजून घेईन; हसन मुश्रीफ यांचा आपल्याच सरकारला खोचक टोला

आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच राज्य सरकारने या यादीत काही मंत्र्‍यांच्या नावापुढे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे नमूद केले आहे.

सह-पालकमंत्री काय आहे? मुंबईला गेल्यावर समजून घेईन; हसन मुश्रीफ यांचा आपल्याच सरकारला खोचक टोला
hasan mushrif
| Updated on: Jan 20, 2025 | 5:23 PM
Share

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३७ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच राज्य सरकारने या यादीत काही मंत्र्‍यांच्या नावापुढे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे नमूद केले आहे. त्यातच आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरुन प्रश्न विचारण्यात आला. सध्या मंत्री प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. तर माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री आहेत. यातील सह पालकमंत्रीपदावरुन हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

कोल्हापुरातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच

“मी गेले २० वर्ष मंत्री आहे. मी कोल्हापुरातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच आहे. मला कमी वर्ष मिळाली असली, तरी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. सह-पालकमंत्री ही नवीन पद्धत सुरु झाली आहे. पूर्वी त्या जिल्ह्यातील मंत्री हा सह-पालकमंत्री असायचा. पण मी मुंबईला गेल्यावर सह-पालकमंत्री काय आहे, हे समजून घेईन”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

कोणाकडे कोणते पालकमंत्रीपद?

दरम्यान नुकत्याच जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीनुसार, मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेंकडे देण्यात आले आहे. तर मुंबई उपनगराचे पालकत्व दोघांकडे असणार आहे. आशिष शेलार हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. त्यासोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्याकडे असणार आहे. तसेच नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार असणार आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?