
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश दिल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापौरपद आपल्याकडेच राहावं, यावर भाजप ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाण्याच्या महापौरपदासाठीही भाजपने दोन वर्षांचा दावा कायम ठेवला आहे. तर मुंबई आणि अन्य महापालिकेत महायुतीत सन्मानपूर्वक तोडगा काढा असे निर्देश दिल्लीतील नेतृत्त्वाने दिले आहेत. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असून आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
इम्तियाज जलील यांच्याकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना ट्रेनिंग
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक
शहरातील देशी दारू दुकानं व हर्सूल परिसरातील कचरा डेपो हटवण्यासाठी आक्रमक होण्याच्या सूचना
इम्तियाज जलील यांचा नगरसेवकांसोबत संवाद
मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच असावा
मनसेचं आमदार नरेंद्र मेहता यांना पत्र
मराठी महापौर न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मीरा -भाईंदरमध्ये मराठी महापौरासाठी मनसे आग्रही
कल्याण, डोंबिवली महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे 4 नगरसेवक गैरहजर
अखेर शिवसेना ठाकरे गटाकडून 7 नगरसेवकांचा गट स्थापन
मधुर म्हात्रे ,कीर्ती ढोणे नॉट रीचेबल असतानाच आज स्वप्नाली केणे आणि राहुल कोट गैरहजर
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
२३ जानेवारी रोजी पुणे शहरातील शाळांना सुट्टी
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून जात आहे ग्रँड टूर सायकल स्पर्धा
यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार
पुण्यातील कॅम्प परिसरातून जात आहे ग्रँड टूर
यादरम्यान कॅम्प परिसरातील सरकारी व खाजगी शाळा राहणार बंद
वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी
प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी संगीतकार ए.आर. रहमान यांच्या विधानावर टीका केली आहे. जलोटा म्हणाले की जर ते म्हणतात की त्यांना मुस्लिम असल्याने काम मिळत नाही, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा. कदाचित हिंदू धर्मात परतल्यानंतर त्यांना काम मिळायला सुरुवात होईल.
महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे गुजरातील बॅनर लागल्यान राजकारण तापलं आहे. पालघरमधल्या गुजराती बॅनरवरून वाद पेटला आहे. पालघर जिल्हा प्रशासनाला गुजराती प्रेमांचं भरतं पाहून मराठीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात दोन दिवस युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे काय निकाल येतो याची उत्सुकता वाढली आहे.
कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या बैठकीला दोन नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक गैरहजर राहिले आहेत. आता कोकण भवनात 11 पैकी 7 नगरसेवकच उपस्थित आहेत. त्यामुळे आणखी दोन नगरसेवक नसल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.
कल्याण डोंबिवलीतल ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनात दाखल झाले आहेत. गट स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक कोकण भवनात दाखल झाले आहेत. आमदार वरुण सरदेसाई नगरसेवकांसोबत असल्याची माहिती आहे. 11 पैकी सातच नगरसेवक कोकण विभागीय कार्यालयात दाखल माहिती आहे. 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या कामगिरीवर भाष्य करताना एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “आम्ही 125 जागा जिंकल्या आहेत. एका महिन्यापूर्वी आम्ही सुमारे 75 जागा जिंकल्या होत्या. विजय तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकांची मने जिंकता. जर तुम्ही जिंकण्यात अयशस्वी झालात तर हे स्पष्ट आहे की संबंधित पक्षाच्या काही कमतरता असू शकतात. आम्ही वर्षानुवर्षे जमिनीवर काम करत आहोत.”
मुंबईच्या महापौर पदासाठी आज दिल्लीत राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिवेसेनेचे राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची भाजपच्या अमित साटम, आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा होणार आहे. महापौर पदासहित स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवर चर्चा होणार आहे.
जेष्ठ पुरोगामी नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे. सांगलीमध्ये राहत्या घरात गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराने समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर मध्ये 16 फेब्रुवारी 2015 रोजी जेष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनने संपूर्ण महाराष्ट्रात हादरून गेला होता.
बदलापुरात एका निर्माणाधीन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की खाली कोसळताच मजुराचा मेंदू बाहेर आला. या मजुराचा मृतदेह पाहून दुसरा मजूर जागेवरच कोसळला. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बदलापूर पश्चिमेकडील बदलापूर गाव परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात बहुचर्चित शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये जवळपास 24 कोटी 90 लाख रकमेचा अपहार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 12 जण अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये सर्वसामान्य महिलेने नगरसेवकपदाला गवसणी घातली आहे.वडापावचा गाडा , शिवणकाम, भाजी विकून आणि खानावळ चालवत महिलेने नगरसेवकपदाला गवसणी घातली आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये महिला नगरसेवकाचा पराभव करत कविता लोखंडे यांनी मैदान मारलं आहे. संघर्षासोबत पतीने केलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर कविता लोखंडे या नगरसेविका झाल्या आहेत.
मावळमधून मोठी अपडेट समोर आली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. वडगाव मावळमध्ये आज पंचायत समिती-जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आले.
राष्ट्रवादी काँग्रेसची पंचायत समिती चौकात सभा सुरू होती. त्यावेळी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजप उमेदवार हे सभास्थळावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
यावेळी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना नमस्कार केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार आणि नेते जात असताना एकच जल्लोष केला. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते गणेश भेगडे यांनी संताप व्यक्त करत अपशब्द वापरले.
वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने आज महिलांचा संताप उफाळून आला. हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्या होत्या.मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे.वारंवार विनंती करूनही आत प्रवेश न मिळाल्याने महिला संतप्त झाल्या. या संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या जिल्हा परिषदेत आपलं नशिब आजमवणार आहेत.अर्चना पाटील या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
अर्चना पाटील यांनी भाजपकडून तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून द्यायचा असे गटातील लोकांना सांगणार, असं म्हणत अर्चना पाटील यांनी उमेवारी अर्ज दाखल करतानाच थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे.
जिल्हा परिषदेच अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तसेच यापूर्वीही अर्चना पाटलांनी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
मीरा भाईंदरमध्ये राजकिय आरोप-प्रत्यारोपानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना आव्हान दिलं आहे. विकासाची अडकलेली 3 काम प्रताप सरनाईक यांनी अगोदर करून दाखवा मगच बोला, असं आव्हान नरेंद्र मेहता यांनी दिलं आहे.
शक्ती राय यांची सेक्युरिटी एजन्सी असून टेंडर संपल्यानंतर देखील दोन कर्मचाऱ्यांचा थकीत पगारावरुन वाद झाल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या साथींधारासह मिळून केली बेदा मारहाण
गोंदियामध्ये विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना दणका. 104 वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इगतपुरी तहसील कार्यालयात तीन साप निघाल्याची घटना. तहसीलदार यांच्या कार्यालयात एक साप, तर टपाल शाखेत पंधरा मिनिटांच्या अंतराने निघाले दोन विषारी साप. साप दस्तऐवज मधून निघताना तहसीलदारांच्या लक्षात आले.
पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या मॅनेजरच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात घरात दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दुधवाल्यानेच चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव व्यंकटेश करंडे असे आहे. घरातून १ लाख ३२ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून घरावरील डिजिटल लॉकचा पासवर्ड टाकून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर १७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पासवर्ड सापडताच त्याने घरात प्रवेश करून रोकड लंपास केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान वारजे-कर्वेनगर परिसरात राडा झाला आहे. आता मनसे उमेदवाराला चांगलाच महागात पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राम बोरकर यांच्यासह २० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्याशी झटापट केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. यामध्ये मनसेच्या पुरुष कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांचाही समावेश असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वडगाव मावळ तहसील कार्यालयात उमेदवारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार लगबग सुरू केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांच्या दालनात अर्जांची छाननी आणि तांत्रिक पूर्तता करून उमेदवार आपले नामांकन सादर करत आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे तहसील कार्यालय परिसर दिवसभर कार्यकर्त्यांच्या गर्दीने आणि घोषणाबाजीने गजबजलेला आहे. आता सर्वांचे लक्ष अर्जांच्या छाननीनंतरच्या पुढील राजकीय घडामोडींकडे लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप-महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कामेरी जिल्हा परिषद गटातून महायुतीचे अधिकृत उमेदवार जयराज पाटील (दादा) यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात दाखल केला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कामेरी परिसरात महायुतीने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
सांगली जिल्ह्यात तब्बल तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इच्छुकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. सोमवार अखेरपर्यंत दोन्ही निवडणुकांसाठी मिळून एकूण १,१३८ अर्जांची विक्री झाली असून, आतापर्यंत २६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ४११ तर पंचायत समितीसाठी ७२७ अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. येत्या दोन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, यामध्ये ११ पैकी ९ नगरसेवकांनी आपली उपस्थिती दर्शवली. या बैठकीत नगरसेवक उमेश बोरगावकर यांची ठाकरे गटाच्या गटनेता पदी एकमताने निवड करण्यात आली असून, त्यांच्या नावाचे पत्र अधिकृत मान्यतेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या बैठकीला मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पत्राद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही त्यांनी पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर आता अनुपस्थित राहिलेल्या दोन्ही नगरसेवकांवर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चिपळूण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने येथे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी ही माहिती दिली आहे. हा निर्णय स्वतः अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत अधिक संधी मिळावी, या उद्देशाने हा पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे चिपळूणमधील राजकीय रणधुमाळी अधिक वाढली आहे. विजयाची १०० टक्के खात्री असल्याचे मुकादम यांनी सांगितले आहे. सध्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ५० हजार ६८९ रुपयांवर गेला आहे, तर चांदीने ३ लाख १७ हजार २४० रुपयांचा टप्पा गाठला आहे. नवीन वर्षाच्या अवघ्या २० दिवसांतच सोन्यात १३ हजार तर चांदीत ७३ हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी चर्चा आहे.
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत बीड पोलीस मुख्यालयातील दोन कॉन्स्टेबलने रात्री एक वाजता छापा टाकत ऑनलाइन बेटिंग करणाऱ्या चार आरोपींसह 11 मोबाईल आणि दोन लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कारेगव्हाण परिसरात हे काम सुरू होते अशी माहिती कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे. करोडो रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे या मोबाईल मधून उघड झाले आहे. आरोपींचे परदेशात कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यासंदर्भात पोलिसांकडून अधिक ची माहिती मिळालेली नाही तसेच अद्याप पर्यंत गुन्हा दाखल नसून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. भाजप आणि शिवसेना मध्ये काल रात्री उशिरा, तब्बल रात्री २ वाजेपर्यंत चर्चा सुरू होती.मात्र या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आज पुन्हा युती संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती आहे.जागावाटपावर बहुतांश ठिकाणी एकमत झाले असले, तरी अद्याप चार जागांवरून मतभेद कायम असल्याचे समजते.दरम्यान, सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार हे युतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
ठाणे महानगरपालिका महापौर आणि उप महापौर कार्यालयाची स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे. येत्या 22 जानेवारी गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वतीने आरक्षण सोडत महापौर पदासाठी होणार आहे. उपमहापौर कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो अजून देखील कार्यामध्ये दिसून येत आहे मात्र महापौर कार्यालयामध्ये दिवंगत नेते आनंद दीघे आणि एकनाथ शिंदे ,बाळासाहेब ठाकरे,याचे फोटो दिसून येत आहे. योग्य सन्मानपूर्वक पद महापूर पदाची दिली गेली नाही तर वेगळा विचार केला जाईल तसेच विरोधक म्हणून बसावे लागेल असे भाजपचे आमदार संजय केळकर आणि भाजप आमदार यांनी एक प्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता.
परभणीत शिवसेना उबाठा गटात दोन तगड्या उमेदवारांचा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी आम्ही पैसे वाटून, मतदान याद्यांमध्ये घोळ करून,बोगस मतदारांचा समावेश करून आम्ही कधी मत घेतले नाहीत असा खासदार जाधवांनी पालकमंत्री बोर्डीकरांवर निशाणा साधला. माझं काही चूक असेल तर मी राजीनामा देतो,तुमचं काही चूक असेल तर तुम्ही राजीनामा देता असं आवाहन खासदार संजय जाधव यांचं पालकमंत्र्यांना केले.
भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भाजपमध्ये शून्यापासून शिखरापर्यंत नेतृत्व पोहचतं. भाजप हा एक संस्कार आहे. भाजप हे एक घर आहे. भाजप पदाने नाही प्रक्रियेतून मोठी झाली आहे. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजप मजबूत झाल्याचे पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबीन यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचे शक्तिप्रदर्शन करत एकत्र नोंदणी कोकण भवन येथे दोन दिवसांनी होणार आहे. कोकण भवन येथील नगर विकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार. यावेळी महायुती चे शक्तीप्रदर्शन केले जाणार… मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर शिवसेना आणि भाजप चे नगरसेवक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपाचाच महापौर राहणार, महायुतीतील अन्य घटक पक्षांना सोबत घेणार नाही असं अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
भाज ने महापालिकेत 74 पैकी 50 जागा जिंकल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांना पैकी शिवसेनेला योग्य तो सन्मान दिला जाईल, मात्र त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाणार नाही असे स्पष्ट संकेत अनुप अग्रवाल यांनी दिले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीत शिवसेना (UBT) ला धक्का बसला. निवडणूक अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.उपतालुका प्रमुख व माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि एमआयडीसी/आजदे/सागर्ली विभाग प्रमुख नंदू ठोसर यांनी जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्याकडे राजीनामा सादर केला. महापालिका निवडणुकीतील प्रभाग १९ मध्ये उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचा बिनविरोध विजय झाल्याने अपयशाची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला. राजीनाम्यानंतरही शिवसैनिक म्हणून सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले.
शिवेसना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार . संजय राऊत यांच्या भेटीत राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते.
कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका चालत्या बसला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग कशी लागली याचा तपास सुरू आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे. समीर गायकवाड असे त्याचे नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. . सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.
11 वर्षांपूर्वी, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली. त्याप्रकरणी समीर हा संशयित आरोप होता.
इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक कारंजवाडी येथील शिक्षकाने सलग आठ महिने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष, भिती दाखवून दमदाटी करत अत्याचार केला. मुलीने हिंमत करून घरच्यानसमोर मांडली आपली व्यथा मांडली. रामचंद्र मनाजी कचरे या 55 वर्षीय संशयित शिक्षकास अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत घोटी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौर नव्हे तर स्थायी समित्यांमध्ये शिंदे यांना रस आहे. महापौर युतीचा होणार बोलता, मग सौदेबाजी कशासाठी? ब्लॅकमेल करुन दुसरं पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताय. आमचे केडीएमसीतील दोन नगरसेवक दिसत नाहीत… यावर कारवाई सुरु आहे.
प्रबळ दावेदारांकडून विविध पातळ्यांवरून पक्षाकडे मोर्चे बांधणी सुरू, दावेदारांमध्ये मनपा राजकारणातील ज्येष्ठता , पक्षी श्रेष्ठींबरोबरची जवळीक अनुभव, शिफारस, पक्षनिष्ठता या निकषांचा केला जाणार विचार. महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार असले तरी प्रबळ दावेदारांकडून मोर्चे बांधणी
मुंबईत महायुतीत तडजोड करण्याची गरज नाही आणि मुंबईचा महापाैर हा महायुतीचाच होणार असल्याचे स्पष्ट शब्दात अमित साटम यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. एका खिचडी विक्री करणाऱ्याच्या तरुणाची खीचडी रस्त्यावर फेकून दिली आहे. शहरातील जाधवमंडी येथे रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. त्यामुळे याठिकाणी छोट्या छोट्या हॉटेलवर नाश्ता विक्रीसाठी तयार केला जातो.पण रात्री उशिरापर्यंत हॉटेल कशी सुरू ठेवली म्हणत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या खिचडीचा पातेले फेकून दिले.
पहाटे घराचा मुख्य दरवाजा उघडा आढळल्याने खळबळ. 14 वर्षीय आणि दोन 13 वर्षीय मुलीचा समावेश. पहाटे उठल्यानंतर कुटुंबीयांना मुली घरात नसल्याचे लक्षात आले. परिसर, शाळा व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलींचा पत्ता नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा कुटुंबाचा संशय
केज तालुक्यातील एका गाव परिसरातील शेतात सासु आणि जावेसोबत कापूस वेचत असलेल्या महिलेशी आरोपी अर्जुन महादेव घुगे याने वाईट हेतुने झटापट केली. या घटनेनंतर महिलेने युसुफ वडगाव पोलिसात तक्रार दिली असुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर काल रात्री दोन वाजेपर्यंत पंचतारांकित हॉटेलमध्ये खलबते झाली. परंतु युतीबाबत काहीही ठोस निर्णय झाला नाही. आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे नेते सकाळी युती बाबत पुन्हा चर्चेला बसणार आहेत
पुणे महापालिकेच्या 2026 – 27 या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून 30 जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केलं जाईल. सुमारे 15000 कोटी रुपयांपर्यंत हे अंदाजपत्रक जाणार असून यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, नवीन रस्त्यांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली आहे.
पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांकडून नऊ महिन्यांत 17 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात 1 एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 60 हजार 721 बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून 17 कोटी 18 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रवास करणाऱ्या तरुणींचे एका परप्रांतीय तरुणाने लपून मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा आरोप करत स्टेशन परिसरात गोंधळ घालण्यात आला. फोटो काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मराठी युवकांनी जाब विचारत चोप दिला. फोटो काढलेल्या महिला प्रवाशांनीदेखील तरुणाला धडा शिकवला आहे. आरोपीला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश दिल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापौरपद आपल्याकडेच राहावं, यावर भाजप ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून महापालिकेला पुन्हा दणका देण्यात आला आहे. लवादाने संपूर्ण अहवाल सादर केल्याशिवाय तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये असं स्पष्ट करत स्थगिती दिली आहे.
पुणे- जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीची बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने ही रणनीती आखली आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिल्याने बंडखोरी टाळण्यात यश आलं होतं. जिल्हा परिषद पंचायत समितीला अनेक इच्छुक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शेवटच्या क्षणाला ए बी फॉर्म देणार आहे.
पुणेकरांनी विरोधात बसण्याचा कौल दिला असून आपण आपली कामगिरी चोखपणे पार पाडली पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभाराचा पूर्ण अभ्यास करावा आणि पुणेकरांची बाजू प्रकल्पने महापालिकेच्या सभागृहात मांडावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिली आहे.
नाशिकमध्ये गोदावरी जन्मोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी मातेचा माघ मास जन्मोत्सव सुरू झाला आहे. पुढील बारा दिवस हा गोदावरी जन्मोत्सव सुरू राहील. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. तर मुख्य आकर्षण 28 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता होणारा जन्म सोहळा असेल.
मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याचं समजतंय.
शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज सकाळी 11 वाजता कोकण भवनला जाणार आहेत. शिवसेना नगरसेवकांचा ताज लॅंड्स एंड हाॅटेलमध्ये मुक्कामाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांच्या भेटीसाठी एकत्र गाडीतून रवाना होणार आहेत. निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांकडे पुरावे सादर करणार आहेत.