AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा ? त्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. अजित पवार गटाने हे वृत्त फेटाळले असले तरी, शरद पवार गटाच्या पुण्यातील गुप्त बैठक आणि मुंबईतील आजच्या बैठकीने या चर्चांना बळ दिले आहे. शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळल्या, पण भविष्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा ? त्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..
राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही ?
| Updated on: May 20, 2026 | 11:46 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सूत्र स्वीकारली तसेच उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली. अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर चढला, रोहित पवारही याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, अशी कोणतीही चर्चा नव्हती असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला होता.

मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. तर आजही मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अनक नेते मुंबईत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते असलेले शशिकांत शिंदे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधव विविध विषायंवर प्रतिक्रिया दिल्या.

काय म्हणाले शशिकांत शिंदे ?

त्यावेळी शशिकांत शिंदे यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी थेट उत्तर दिलं. आज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावली आहे. भविष्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत ही बैठक आहे असं ते म्हणाले. रोहित पवार हे नाराज असून ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा असून त्याबद्दलही शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. ” मला माहिती नाही. ते काही नाराज नाही. पक्षात नाराज कोणीच नाही. अश्या बातम्या काढून चालवू नका..” असं त्यांनी थेट उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलयांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हापासून विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला . ” मी मगाशीच सांगितलं पवार साहेबांची अनेकांनी भेट घेतली. अनेक जण त्यांना भेटत असतात. त्यांचा काही वेगळा अर्थ काढू नये ” असं त्यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरनाबाबत कोणतीही चर्चा नाही. कोणताही प्रयत्न नाही, असंही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट करत विलीनीकरणाच्या चर्चांवर थेट पडदा टाकल्याचं दिसून आलं.

आव्हाडांची मोदींवर टीका

यावेळी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ” 2014 साली नरेंद्र मोदी हे सत्तेत आले, तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले है. 12 वर्षांच्या वनवासानंतर या देशात न बोलतना नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आनेवाले है, तयार रहो. प्रश्न हा आहे की बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना , ते नेदरलंडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणारेत तर ते कोणावर येणार, पेट्रोल पुढच्या 1 महिन्यात 20 रुपयांनी महागणार आहे, मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल-डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल-डिझेवर पाण्याचे पंप चालतात, अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे.जगवणार कसं माणसांना ? बोलायला खूप ठीका ाहे तुम्ही एक गाडी वापरा, सायकलवर चला.. असा देश चालत नाही ना ” असं टीकास्त्र आव्हाड यांनी सोडलं.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?