पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा ? त्या नेत्याने स्पष्टच सांगितलं..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. अजित पवार गटाने हे वृत्त फेटाळले असले तरी, शरद पवार गटाच्या पुण्यातील गुप्त बैठक आणि मुंबईतील आजच्या बैठकीने या चर्चांना बळ दिले आहे. शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळल्या, पण भविष्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सूत्र स्वीकारली तसेच उपमुख्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली. अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर चढला, रोहित पवारही याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, अशी कोणतीही चर्चा नव्हती असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला होता.
मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. तर आजही मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अनक नेते मुंबईत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते असलेले शशिकांत शिंदे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधव विविध विषायंवर प्रतिक्रिया दिल्या.
काय म्हणाले शशिकांत शिंदे ?
त्यावेळी शशिकांत शिंदे यांना विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी थेट उत्तर दिलं. आज पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावली आहे. भविष्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत ही बैठक आहे असं ते म्हणाले. रोहित पवार हे नाराज असून ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा असून त्याबद्दलही शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. ” मला माहिती नाही. ते काही नाराज नाही. पक्षात नाराज कोणीच नाही. अश्या बातम्या काढून चालवू नका..” असं त्यांनी थेट उत्तर दिलं.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलयांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हापासून विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला . ” मी मगाशीच सांगितलं पवार साहेबांची अनेकांनी भेट घेतली. अनेक जण त्यांना भेटत असतात. त्यांचा काही वेगळा अर्थ काढू नये ” असं त्यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरनाबाबत कोणतीही चर्चा नाही. कोणताही प्रयत्न नाही, असंही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट करत विलीनीकरणाच्या चर्चांवर थेट पडदा टाकल्याचं दिसून आलं.
आव्हाडांची मोदींवर टीका
यावेळी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ” 2014 साली नरेंद्र मोदी हे सत्तेत आले, तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले है. 12 वर्षांच्या वनवासानंतर या देशात न बोलतना नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आनेवाले है, तयार रहो. प्रश्न हा आहे की बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना , ते नेदरलंडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणारेत तर ते कोणावर येणार, पेट्रोल पुढच्या 1 महिन्यात 20 रुपयांनी महागणार आहे, मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल-डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल-डिझेवर पाण्याचे पंप चालतात, अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे.जगवणार कसं माणसांना ? बोलायला खूप ठीका ाहे तुम्ही एक गाडी वापरा, सायकलवर चला.. असा देश चालत नाही ना ” असं टीकास्त्र आव्हाड यांनी सोडलं.
