Maharashtra News LIVE : पुणे जिल्ह्यात दोन घटनांनंतर चाकणमध्ये अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग

Meta Description (Marathi): भोरमधील अत्याचार प्रकरणाचा निषेध केला जात आहे. नाशिकमध्ये ११ हजार विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. तर दुसरीकडे भोंदू अशोक खरातवर ईडीची कारवाई केली जात आहे.

Maharashtra News LIVE : पुणे जिल्ह्यात दोन घटनांनंतर चाकणमध्ये अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग
breaking news
| Edited By: | Updated on: May 03, 2026 | 11:10 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 03 May 2026 11:10 AM (IST)

    नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकरा किलो चंदनाचा लेप

    नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकरा किलो चंदनाचा लेप लावण्यात आला. तर मंदिरात 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली. उष्म्यापासून चांदीच्या गणपतीला थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात चांदीचा गणपती सुप्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णता वाढत असल्याने मंदिरात गारवा निर्माण करण्यासाठी चंदन लावण्यात आलं आहे.

  • 03 May 2026 11:00 AM (IST)

    साध्वी कंचनजी महाराज यांनी मराठी भाषेसंदर्भात घेतली हाजी अराफत यांची भेट

    मुंबईतील कुर्ला इथल्या वाहतूक गड मध्यवर्ती कार्यालयात जगद्गुरु माता साध्वी कंचनजी महाराज यांनी मराठी भाषेसंदर्भात हाजी अराफत यांची भेट घेतली. मराठी भाषा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या मराठी प्रशिक्षण पुस्तकाचं उद्घाटन करून उपस्थित रिक्षाचालकांना पुस्तकाचं वितरण करण्यात आलं.

    साध्वी कंचन जी महाराज यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून तिचा सन्मान राखावा, असं आवाहन केलं. राज्य सरकार आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगत वाहतूक कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबतही आश्वस्त केलं.

  • 03 May 2026 10:50 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेने पाणी पातळीत झपाट्याने घट

    धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यामध्ये 34% पाणीसाठा शिल्लक आहे 226 प्रकल्पापैकी 25 प्रकल्प असून 80 प्रकल्पामध्ये केवळ पंचवीस टक्केच पाणी शिल्लक आहे जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने धरणातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे या संदर्भात तेरणा धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी पाहुयात

  • 03 May 2026 10:40 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील कळंब ढोकी परिसरात पेट्रोल डिझेल टंचाई

    अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्याने बंद, शेती मशागतीची काम ठप्प. दररोज दैनंदिन कामालाही मोठा फटका, पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिक संतप्त,सकाळी पेट्रोल पंप बंद. पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक.

  • 03 May 2026 10:30 AM (IST)

    पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठी काम करत आहेत- संजय राऊत

    संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. पुण्याच्या घटनेबद्दल बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी म्हटले की, पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठी काम करत आहेत.

  • 03 May 2026 10:20 AM (IST)

    सरकारला जबाब विचारला पाहिजे- संजय राऊत

    संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान करत म्हटले की, सरकारला माता भगिनींनी जाब विचारला पाहिजे. पुण्याच्या घटनेवरून संजय राऊत सरकारवर टीका करताना दिसले.

  • 03 May 2026 10:05 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांना फक्त इतर राज्यातील प्रचारावेळ- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी अत्यंत मोठी टीका केली. संजय राऊत यांनी पुण्याच्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांना फक्त इतर राज्यातील प्रचाराकरिता वेळ आहे.

  • 03 May 2026 09:56 AM (IST)

    नागपुरात सामूहिक कॉपी भोवली! २४३ विद्यार्थ्यांवर बोर्डाची मोठी कारवाई, २ केंद्रांची मान्यता रद्द

    नागपूर: बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करणाऱ्या २४३ विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने मोठा दणका दिला आहे. वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला असून, या केंद्रांची मान्यताही बोर्डाने आता कायमची रद्द केली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी निकालासोबतच बोर्डाने या कारवाईची घोषणा केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पेपर तपासणी दरम्यान शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही चौकशी करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची ही अलीकडच्या वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.

  • 03 May 2026 09:46 AM (IST)

    जळगावच्या धरणगाव शहराचा पाणीपुरवठा ३ दिवस राहणार बंद; मुख्य जलवाहिनी फुटल्याने हाल

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी हे काम पूर्ण झाल्यानंतर टाक्यांपर्यंत पाणी पोहोचून शहराला नियमित पुरवठा सुरू होण्यासाठी किमान २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात ही समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, धरणगाव नगरपरिषदेने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे.

  • 03 May 2026 09:36 AM (IST)

    नाशिक जिल्हयातील ११ हजार विद्यार्थी आज नीट परीक्षा देणार, २१ केंद्रांवर कडक नियोजन

    वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा आज नाशिक जिल्ह्यात पार पडत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २१ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, सुमारे ११ हजार विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. नाशिक शहरातील १८ केंद्रांवर ९ हजार १२९, तर मालेगावमधील ३ केंद्रांवर १ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार असली, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजल्यापासूनच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा पूर्णपणे गैरप्रकारमुक्त आणि सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने कडक नियमावली लागू केली असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 03 May 2026 09:26 AM (IST)

    नाशिक भोंदू बाबा अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीची कोर्टात धाव

    महिलांवर लैंगिक अत्याचार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरातचा ताबा मिळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात धाव घेतली असून ‘प्रॉडक्शन वॉरंट’साठी अर्ज केला आहे. ६ एप्रिल रोजी ईडीने खरातविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी ईडीने खरातच्या कार्यालयावर आणि इतर ठिकाणांवर छापेमारी करून अनेक पुरावे गोळा केले होते. आता खरातची सखोल चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याची मागणी ईडीने केली असून, या अर्जावर येत्या शनिवारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

  • 03 May 2026 09:18 AM (IST)

    पुणे: चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर, राजगड तालुक्यात कडकडीत बंद

    भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सर्व व्यापारी संघटना, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या बंदचे आवाहन केले होते, ज्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. या नराधम आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, ही एकच मागणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

     

  • 03 May 2026 09:13 AM (IST)

    मुंबईत अक्सा चौपाटीवर बुडणाऱ्या ४ मुलांना वाचवले

    उन्हाळी सुट्ट्यांमुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, मालाडमधील अक्सा चौपाटीवर शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत चार मुले बुडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पहिल्या घटनेत १३ वर्षीय विशाल मंजुनाथ चीला हा मुलगा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागला, ज्याला जीवरक्षकांनी तत्परतेने वाचवले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालाड ओरलम चर्च परिसरातून आलेली आरुष मांजरे (१४), संतोष हरिजन (१५) आणि मिल्टन चेट्टी (१६) ही तीन मुले आयएनएस हमला हद्दीजवळ ओहोटीच्या पाण्यात ओढली गेली. या मुलांची प्रकृती धोक्यात असल्याचे पाहून जीवरक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उड्या घेतल्या. या शर्थीच्या प्रयत्नांमुळे चारही मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  त्यांना सुरक्षितपणे पोलीस आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

  • 03 May 2026 09:08 AM (IST)

    धाराशिवमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने पेट्रोल पंप ठप्प; ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

    धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पेट्रोल पंपांवरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. अचानक वीज गेल्याने शहरातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी कळंबमध्ये दाखल झाल्याने गर्दीत अधिकच भर पडली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आता वीज पुरवठा सुरळीत होऊन पेट्रोल पंप पुन्हा सुरू झाले आहेत, ज्यामुळे निर्माण झालेली गर्दी कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 03 May 2026 09:03 AM (IST)

    मिरा भाईंदरमध्ये भीषण आग; झोपडपट्टी जळून खाक

    मिरा-भाईंदर पूर्वेकडील आरएनए प्रोजेक्ट परिसरात आज भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. एका ४ वर्षांच्या बालिकेवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद भोर, राजगड आणि परिसरात उमटले आहे. या नराधमाला फाशी मिळावी या मागणीसाठी भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच संतप्त नागरिकांनी मुंबई-सातारा महामार्ग रोखून धरला आहे. तर दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात आज ११ हजार विद्यार्थी नीट (NEET) परीक्षा देत असून जिल्हा प्रशासनाकडून कडक नियोजन करण्यात आले आहे. तसेच आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात याच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत फास आवळला असून, त्याचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे, ज्यावर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे.

 

Follow Us