
जळगाव जिल्ह्यातील 15 गावांत अशुद्ध पाणी पुरवठा…. 7 तालुक्यांतील पाणी स्रोतांची स्थिती चिंताजनक… फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्रोत दूषित आढळले…
पंढरपुरात चैत्र एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला 11 हजार सूर्यफुलांची सजावट… सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी… पहाटेच्या नित्य पूजेनंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात…
इस्रायलकडून गाझामधील पोलीस चौक्यांवर बॉम्बहल्ला, 6 जण ठार. मृतांमध्ये 3 पोलीस आणि एका मुलीसह 3 नागरिकांचा समावेश. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टिनींवर हल्ले
रिक्षाला गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालक पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरी. एलपीजी गॅस पंप चालक भाव वाढवून मनमानी करत असल्याचा रिक्षा चालकांचा आरोप. शिरसाटांनी पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारींना फोन लावला. पंप चालक मनमानी करत असतील तर लायसन्स रद्द करा, शिरसाटांच्या सूचना
भोंदू अशोक खरातला एसआयटीचे पथक महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून घेऊन निघाले कोर्टात….आज रविवार असल्यामुळे कोर्टाला सुट्टी असल्यामुळे विशेष कोर्टात केले जाणार हजर… महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ते कोर्टाचे चार ते पाच किलोमीटर चे अंतर… मोठा पोलीस बंदोबस्ता भोंदू अशोक खरातला एसआयटी चे पथक घेऊन जात आहे विशेष कोर्टात…
पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारला अपघात. इनोव्हा चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे चालणाऱ्या ट्रक वर जाऊन धडकली. अपघातात एक जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी. जखमींना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल
हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्समध्ये घटना फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. विध्येश्वरी आपटे (वय २३) मृतक विद्यार्थीनीचे नाव आहेय…ती मुळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी. आकार नर्सिंग कॉलेजची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मैत्रिणींसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. घटनेच्या वेळी मैत्रिणी पदवीदान कार्यक्रमाला न जाता, ती फ्लॅटमध्ये एकटीच होती, आत्महत्येपूर्वी प्रियकराला व्हिडिओ कॉल कॉलदरम्यानच टोकाचा निर्णय घेतल्याच बोललं जातं आहेय… दोन दिवसांपूर्वी प्रियकराचे लग्न त्यामुळे मानसिक तणावात असल्याची चर्चा काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती…
सरकारमधील लोक गॅसवर आहेत, छगन भुजबळ म्हणतात की राज्यामध्ये गॅसटंचाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतंय की सर्व काय बरं आहे. सर्वात पहिले लॉकडाउन होणार आहे गुजरातचा लोकांना माहित पडले आणि मग सर्वात मोठी रांग गॅससाठी गुजरातला बघायला मिळाली.
संजय राऊत यांनी नुकताच मोठा आरोप करत म्हटले की, लॉकडाऊनची अफवा गुजरातमधूनच आली आहे. आज लोक रांगेत आहेत. राज्यातही गॅसचा तुटवडा आहे आणि गुजरातमध्येही गॅसचा मोठा तुटवडा आहे. सरकारमध्येच मोठे मतभेद असल्याचा मोठा दावा राऊतांनी केला.
ही हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालीय. जुन्या वादातून दोन गटात कोयता, रॉड आणि फायटरचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांवर केला प्राणघातक हल्ला. या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये परस्परविरोधी फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांनी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून 10 पेक्षा अधिक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी मोठे बदल केले आहेत. उद्यापासून मंदिर दररोज २२ तास दर्शनासाठी खुले राहणार असून, गर्दीचे नियोजन करण्यासाठी ५०० रुपयांचे स्पेशल दर्शन पास बंद करण्यात आले आहेत. ३१ मार्च ते ५ एप्रिल या काळात महाद्वारातून प्रवेश बंद असेल, तर भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांवरून मंदिरात प्रवेश दिला जाईल. यात्रेच्या काळात चोवीस तास शिखर दर्शन उपलब्ध असेल आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना १२ तासांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ मोहिमेत नागपूर विभागाने प्रशासकीय सुधारणांमध्ये बाजी मारली आहे. लोकाभिमुख, तत्पर आणि पारदर्शक प्रशासनासाठी राबवलेल्या या मोहिमेत महसूल विभागाला प्रथम, पोलीस विभागाला द्वितीय आणि जिल्हा परिषदेलाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कार्यपद्धतीत सुधारणा केल्याबद्दल नागपूरच्या या तिहेरी यशाचे कौतुक होत आहे.
राज्याच्या महसूल विभागात मुद्रांक शुल्काच्या (Stamp Duty) वर्गीकरणात मोठी हेराफेरी झाल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’च्या (CAG) अहवालातून उघड झाली आहे. विक्रीच्या दस्तऐवजांचे ‘करारनामा’ असे चुकीचे वर्गीकरण करून मुद्रांक शुल्काचे दर कमी लावण्यात आले, ज्यामुळे राज्य सरकारला साडेदहा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेषतः मुंबईतील बोरिवली-२ उपनिबंधक कार्यालयातील तपासणीत हा प्रकार उघडकीस आला असून, ५ टक्के शुल्काऐवजी केवळ २ टक्के शुल्काची आकारणी करण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरातवर आतापर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ९ महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आणि २ फसवणुकीचे गंभीर गुन्हे आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) गेल्या तीन दिवसांत त्याच्या सील केलेल्या कार्यालयाचा चार वेळा पंचनामा करून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. जादूटोणा, नरबळी आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली एसआयटी पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारणारे लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांना आता ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, जर गृहनिर्माण सोसायट्यांवर पाणीपुरवठ्याचा अन्यायकारक आर्थिक भार टाकला, तर संबंधित विकासकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पुणे शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढली आहे. ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे, तिथे पुणे महानगरपालिकेतर्फे मोफत टँकरची सुविधा दिली जात आहे. मात्र, काही टँकरचालक किंवा मालक नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, पालिकेच्या टँकरसाठी नागरिकांनी कोणतेही पैसे देऊ नयेत आणि कोणी मागणी केल्यास त्याबाबत तक्रार करावी.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या ‘एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५’ नुसार, पुणे विमानतळाने देशातील सर्व विमानतळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. दर्जेदार सुविधा, प्रवाशांचे समाधान आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर पुण्याने गोवा आणि इंदूरला मागे टाकत हे यश संपादन केले असून, यामुळे विद्येच्या माहेरघराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला आज तिसऱ्यांदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिरगाव येथील फार्महाऊसवर पोलिसांनी केलेल्या धाडीत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी तिथून एक पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसे जप्त केली होती. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर रोकड, मौल्यवान वस्तू आणि जादूटोण्याशी संबंधित संशयास्पद साहित्यही हाती लागले आहे. पोलिसांनी जप्त केलेली सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि व्यवहारांच्या नोंदी असलेल्या डायऱ्यांमधून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे, जागतिक युद्धाच्या सावटा मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवू लागले आहेत. गॅस आणि इंधन टंचाईमुळे अनेक ठिकाणी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाढती मागणी आणि मर्यादित साठा यामुळे आगामी काळात गॅसच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.