
-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अक्कलकोटनगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद राहणार – नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय. प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी निर्णय घेतला. – स्वामीभक्त आणि अक्कलकोट वासियांकडून नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण.
सुनिल तटकरे सांगत नाहीत तोपर्यंत चाकणकरांचा राजीनामा होणारप नाही, सुनेत्रा पवार नव्हे तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादीवर ताबा. ते दोनच बॉस आहेत. तटकरेंच्या मनात येईल तेव्हाच चाकणकरांवर कारवाई होईल – विजय वडेट्टीवार यांनी साधला निशाणा.
यापुढे गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर न मिळता केवळ घरपोच मिळणार अशी माहिती सोलापुरातील गॅस एजन्सी चालकांनी दिली आहे.
यापुढे एजन्सीतून गॅस न देता तो घरपोच करायचा आहे अशा सूचना आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. आम्हाला गॅस साठा कमी येत आहे त्यामुळे आमच्याकडे जेवढा गॅस आहे तेवढाच पुरवठा करतोय. रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत गॅस वितरित केला आहे त्यामुळे आमच्याकडे साठा आला की आम्ही देतोय, असं त्यांनी नमूद केलं.
सोलापुरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर मिळावा यासाठी नागरिकांची गॅस एजन्सीबाहेर भलीमोठी रांग पहायला मिळतेय. सोलापुरात गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. “सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही रांगेत थांबलोय, मात्र गॅस एजन्सी बंदच आहे. आम्हाला नंबर लावून आठ दिवस झाले तरीही सिलिंडर मिळत नाही. आम्ही कामं सोडून इथेच थांबायचं का, आमच्याकडे एकच टाकी आहे मग आम्ही काय उपाशी राहायचं का,” असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
गॅस सिलेंडरनंतर पेट्रोल-डिझेलासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. कोल्हापुरात पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी सलग दुसऱ्या दिवशी गर्दी केली आहे. तर नागपुरातदेखील पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशीही रांगा लागल्या आहेत. रत्नागिरीतही हीच परिस्थिती पहायला मिळतेय. पेट्रोल संपणार, अशी अफवा पसरली आणि त्यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करण्यास सुरुवात केली.
भोंदूबाब अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. युती सरकारच्या काळातील 2018 सालचा जीआर समोर आला आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराचं काम पूर्ण केलं होतं. 31 मार्च 2018 रोजी मंदिराच्या निधीसाठी जीआर काढण्यात आला होता.
“अशोक खरात प्रकरणी जप्त केलेले मोबाइल पोलिसांकडे आहेत. पोलीस गृह खात्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि गृह खातं भाजपकडे आहे. देशभरात बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, पण कोणत्या पीडितांचे फोटो, व्हिडीओ समोर आले नव्हते. परंतु कायद्याच्या बालेकिल्ल्यात नाशिकमध्ये त्या महिलांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सरकारला, मंत्र्यांना याची लाज वाटली पाहिजे. महिलांचे फोटो बाहेर कसे येतात, यामागे कोणाचं षडयंत्र आहे, याची चौकशी केली पाहिजे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी फटकारले.
भोंदूबाबा अशोक खरात हा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत प्रचारक होता. भाजप किंवा संघाची निती ही अशाप्रकारच्या बाबा, बुवा, महाराज यांची संघटना बांधायची आहे. त्यांनी वारकरी संप्रदायालासुद्धा राजकारणात ओढलेलं आहे. त्यामुळे भाजपचा या पापाचा मोठा भागीदार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून गॅस टंचाईमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांना आता पाईपलाईनद्वारे थेट गॅस पुरवठा केला जात आहे. यासाठी सुमारे १०० कंपन्यांसोबत करार करण्यात आले असून, त्यापैकी १३ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष पुरवठा सुरू झाल्याने ठप्प झालेले उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे. गॅस टंचाईमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होते, मात्र आता २०० ते ३ हजार किलो गॅसची गरज असलेल्या कंपन्यांना पाईप गॅस मिळाल्याने मोठी उभारी मिळाली आहे. आगामी काळात १८ हजार किलोपर्यंत गॅसची गरज असलेल्या मोठ्या कंपन्यांनाही ही सुविधा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जालना शहरातील दुखी नगर भागात मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. दोन गटांमध्ये झालेल्या या वादात लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणावर अचानक तिघांनी हल्ला चढवला, त्यानंतर दोन्ही बाजूने समर्थक भिडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेला बराच वेळ उलटूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एका ३२ वर्षीय कैद्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर काशिनाथ भोगाडे असे या कैद्याचे नाव असून, तो खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. विशेष म्हणजे, २८ दिवसांची रजा मंजूर झाल्यानंतर भोगाडे कारागृहातून बाहेर पडला होता. मात्र रजा संपल्यानंतर तो ४१५ दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला नुकतेच अटक करून कल्याण कारागृहातून पुन्हा नाशिक रोड कारागृहात आणले होते. जिथे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिकमधील अशोक खरातचा एक धक्कादायक शैक्षणिक खुलासा समोर आला आहे. भविष्य आणि अंकांच्या खेळात लोकांना अडकवणारा खरात प्रत्यक्षात १९८३ च्या दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाला होता, विशेष म्हणजे ज्या गणिताच्या आधारे तो अंकशास्त्राचा दावा करतो, त्यातच त्याला अपयश आले होते. शाळेच्या नोंदीनुसार त्याचे मूळ नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असून त्याने नंतर नाव बदलून ‘अशोककुमार’ केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ ३५.८६ टक्के गुण असतानाही स्वतःला कॅप्टन म्हणवून घेत त्याने हजारो लोकांची फसवणूक केल्याचे आता उघड झाले आहे.
अमरावती शहराजवळील वडगाव माहोरे येथील नागरिकांनी आज रस्ता रोखून धरत जोरदार चक्काजाम आंदोलन केले. परिसरातील स्टोन क्रशरमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या क्रशरमुळे होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत हे स्टोन क्रशर बंद केले जात नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. घराचा प्लॉट विकण्याच्या कारणावरून जेबास तालीब पठाण आणि त्यांची पत्नी रशिदाबी यांच्यात तीव्र वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने रशिदाबीने रागाच्या भरात पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृताच्या पुतण्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे.
साईनामाच्या जयघोषाने दुमदूमली साईनगरी. काकड आरतीनंतर पोथी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल. उद्या मुख्य रामनवमी दिवशी साई मंदिर रात्रभर खुले. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जाणारा हा उत्सव. धर्मध्वज (निशाण) मिरवणूक ठरणार मुख्य आकर्षण…
लग्नातील ‘दोष’ काढण्याच्या बहाण्याने बापाला लुटले, डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणारा दीपक सावंत पोलिसांच्या जाळ्यात. मुलीच्या लग्नातील ‘दोष’ काढण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध पित्याला जाळ्यात ओढलं. विधीच्या नावाखाली सोन्याचे ब्रेसलेट व चांदीची नाणी एका लाल रुमाला ठेवून त्या रुमालाची अदलाबदल करत “6 महिन्यांनी उघडा” सांगून हातचलाखीने केले होते दागिने लंपास
बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे हे ठाकरे सेनेच्या महानगरप्रमुख पदावर असताना त्यांनी भाजपमध्ये केला होता पक्ष प्रवेश. नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवत केली होती राजकीय हितसंबंध असलेल्यांवर कारवाई. अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर झाल्याने त्यांची होणार तब्बल सहा महिन्यानंतर न्यायालयीन कोठडीत सुटका
घरा खालून भूमिगत मेट्रोमार्गीका गेली असल्याची माहिती असताना शुक्रवार पेठेतील धनंजय मोटे नामक घरमालकाने बोरवेल घेतल्याने स्वारगेट पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गीकेत पाणी गळती झाल्याचा प्रकार उघडीस आला झाला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना नुकतीच घडली त्यानंतर मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका घरमालकासह ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात आजारी महिला झोपलेली असतानाच KDMC कडून घर सील, संतापजनक प्रकार उघड. तब्बल 4–6 तास महिला घरातच कोंडली, आरडाओरडीनंतर अधिकाऱ्यांनी सील काढलं. शेजाऱ्यांनी महिला आत असल्याचं सांगूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अनेक महिला पुढे येऊन तक्रार देत आहेत. राज्यातील बडे नेते आणि बड्या अधिकाऱ्यांसोबत भोंदू अशोक खरात याचे फोटो व्हायरल होत आहेत. अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला. मंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर अनेकांनी टीका केली. आजही अधिवेशनात तो मुद्दा गाजताना दिसेल. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने कहर केला असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल युद्धात अनेक घडामोडी घडत आहेत. युद्ध थांबवण्याकरिता इजिप्तसारखे काही देश पुढे आली आहेत. राज्यातील काही भागात एलपीजी गॅसचा तुटवडा बघायला मिळत आहे. सरकारकडून एलपीजी गॅसची समस्या दूर करण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेशातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..