
टेनिस क्रिकेटला मिळणार नवा राष्ट्रीय चेहरा; ITCSF च्या नॅशनल प्रेसिडेंटपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा. Tennis Cricket Sports Federation of India (ITCSF) तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
परिस्थितीचा अधिक विचार करण्याचा फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्ती याचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो असे मोहन भागवत म्हणाले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आर्थिक कारभारात गंभीर अनियमितला असून, बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बढत्यांना तातडीने स्थगिती द्यावी. तसेच निवृत्त उच्च न्यायालयाने न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी केलीय.
टँकर अपघातामुळे ३२ तास ट्रॅफिक जाम झाल्याची घटना घडली होती. MSRDCने डिसेंबर २०२५ मध्ये १६,००० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय. जो ९४.५ किमीच्या एक्सप्रेसवेला ६ ते १० लेनमध्ये अपग्रेड करेल. प्रस्ताव चार महिन्यांपासून प्रलंबित,मार्च २०२६ च्या बजेट सत्रात मंजुरीची अपेक्षा.
चाकण येथील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
भरधाव इनोव्हाकारने 4 पॅगो रिक्षा, एक मोटर सायकल आणि एका घराचे केले नुकसान.. मध्यरात्री 2.30 वाजता घडली घटना. या अपघातात वाहनांचं झालं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर घराची भिंतही पडली..सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.. इनोव्हाकार चालक शुभम पेवाल याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील कर्तव्य बजवलेला भत्ता मिळात नसल्याने पोलीस हतबल. निवडणूक विभागाला निवेदन देऊनही भत्ता न मिळाल्याने पोलिसांची नाराजीय जिल्ह्यातील 20 पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांचा भत्ता मिळावा अशी स्थानिक पोलिसांची मागणी. यासंदर्भात पहारा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी पाहुयात
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर NIFT प्रवेश परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ. आठ नंबर इमारतीतील Late Shri B.R. Wankhede Education Hub / Sornet ITI / Genus Pvt. Ltd. येथे परीक्षा केंद्र. जवळपास 600 विद्यार्थ्यांची एका दिवसात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन पेपरची परीक्षा
नागपूर महानगरपालिकेची रिकामी तिजोरी आणि वाढती जबाबदारी, नव्या पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार. मनपाच्या मालमत्ता आणि नगररचना विभागात ४०० कोटींची तूट. ५,४३८ कोटींचा अर्थसंकल्प असतांना अपेक्षित उत्पन्न नाही…मालमत्ता करातून ४०० कोटींचे लक्ष्य, जानेवारी अखेर फक्त १७३ कोटी वसुल. मार्चपर्यंत वसुली २०० ते २२५ कोटींवरच थांबण्याची शक्यता…नगररचना विभागाचे ५०० कोटी लक्ष्य, जानेवारीअखेर २५० कोटी वसुल
महापौर निवड उद्या होणार आहे… पुण्यातील महापौर बंगल्याच्या डागडुजीचे काम अंतिम टप्यात आहे. महापौर बंगल्याचे रंग काम, फर्निचर, इलेक्ट्रिक कामे सुरु आहेत. त्याच बरोबर खराब झालेल्या वस्तूंच्या जागी नवीन वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे.
शहरासह उपनगरातील किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने पहाटे आणि रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा वाढला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात चढउतार होत असल्यामुळे थंडीचा जोर ही अधिक होत आहे. दर दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे उखळा जाणवत आहे त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी उन्हाचा चटका असा विचित्र हवामानामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत.
एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या. त्या दोन ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची प्रशासनाची माहिती. दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करुन स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर पंचनामा करत या मशिन्स ठेवण्यात आल्यात.
मित्रमंडळ चौकातील घटना आहे. घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहेत. महावितरणच्या डीपी बॉक्समध्ये कुलूप तोडून वाहिनीला हात लावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही तरुणाने कुलूप का तोडले यामागे कारण समजू शकले नाही… मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय 30 ते 35 वर्ष असल्याची माहिती समोर येत आहे.
दिवा येथील शिळफाटा परिसरात मित्र-मैत्रिणींना सोबत खेळताना ६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या डबक्यात तोल जाऊन पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कशफ नबीला खान, आशना हाईट्स, शिळफाटा असे मृत मुलीचे नाव आहे. सायंकाळपासून शोध सुरू झाल्यानंतर शनिवारी डबक्यात मृतदेह आढळल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. डायघर पोलीस ठाण्यात नोंद करत अग्निशमन दल व पोलिसांकडून पुढील तपास सुरू झाला आहे.
मामा राजवाडे यांचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे गोळीबार प्रकरणात कारागृहात आहेत. गोळीबारा सह खंडणी आणि बार तोड फोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत आहेत. जामीन अर्ज भेटल्याने कारागृहातला मुक्काम वाढला आहे.
संत श्री गजानन महाराज आज 148 वा प्रगट दिन उत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात साजरा करण्यात येत आहे.. यानिमित्त राज्यासह परराज्यातून 700 च्या वर दिंड्या दाखल झाल्या आहे .. आज दिवसभर लाखो भाविक शेगावात येणार असून संतनगरीत भाविकांची मांदियाळी पहायला मिळणार आहे ..
एकता कॉलनी ग्राउंड परिसरात पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद ऑटो रिक्षाची तपासणी केली असता, त्यामध्ये ५ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत १ लाख २६ हजार २५० रुपये आहे. कारवाईदरम्यान एक आरोपी पसार झाला असून, शेख इरसाद शेख मोहम्मद आणि अरमान अली या दोघांना अटक करण्यात आली आहे. ऑटो रिक्षा, दुचाकी व मोबाईलसह एकूण ३ लाख ८७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पसार आरोपीचा शोध व पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत.
नाशिक विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. विमानतळ विस्तरीकरण कामाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विकास प्रकल्प होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह विमानतळाची क्षमता वाढवली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला शेतीमाला आयात निर्यातीसह प्रवासी वाहतुकीस विमानतळ उपयुक्त ठरणारा आहे. आज गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे नागपुरातील गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी जमली आहे. वर्धा रोड वरील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त पोहचत आहेत. तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे. भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद रहाणार असून महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरु ठेवण्यात येणार होते मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महाशिवरात्री काळात म्हणजेच 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे… राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा…