AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पुरग्रस्त भागातील पंचनाम्यांना आजपासून सुरुवात, अन्नधान्य अन् 5 हजारांची आर्थिक मदत मिळणार”

पुरग्रस्त भागातील लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी,आजपासून पंचनाम्यांना सुरुवात; अन्नधान्य अन् आर्थिक मदत मिळणार; मंत्री अनिल पाटील यांची घोषणा

पुरग्रस्त भागातील पंचनाम्यांना आजपासून सुरुवात, अन्नधान्य अन् 5 हजारांची आर्थिक मदत मिळणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 24, 2023 | 8:21 AM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. पिकंच्या पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. घरांची पडझड झाली आहे. शिवाय घरातलं साहित्य वाहून गेलंय. राहतं घर पाण्याच्या विळख्यात सापडलंय. सर्वसामान्य लोकांचे हाल झालेत. शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आजपासून पुरग्रस्त भागांचे पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत. तसंच तात्काळ पुरग्रस्तभागातील लोकांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसंच अन्नधान्याचीही मदत सरकार आजपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे.

जगायचं कसं?

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे शेती खरडून गेलीय. अशात पिकांचं नुकसान तर झालंच आहे. पण कसदार शेतीच वाहून गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.

यवतमाळमधील महागावमध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशात योगेश नावाच्या युवा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या दहा एकर शेतीचं नुकसान झालं आहे. जनावरांना खाण्यासाठी चाराही शिल्लक नाहीये. अशात जनावरांना घेऊन चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.

“आम्हाला पुरेशी मदत करा”

मुसळधार पावसामुळे राज्यभरात शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झालाय. शेतीच्या झालेल्या या नुकसानीमुळे जगायचं कसं? असा सवाल शेतकऱ्यापुढे उभा राहिलाय. अशात सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आहेत. सरकारने तुटपुंजी मदत करू नये तर भर भक्कम मदत करावी, जेणे करून आम्ही पुन्हा उभं राहू शकू. आमचे संसार वाहून गेलेत. ज्यावर आमचं घर चालतं ती शेती वाहून गेलीय. अशात आम्हाला पुन्हा उभं राहायचं असेल तर आर्थिक मदत गरजेची आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.

दरम्यान, सध्याही महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय, अशात शेतीचं मोठं नुकसान होतंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची पाणी पातळी 39.3 इंचावर पोहचली आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावासाची रिमझिम कायम आहे.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?