AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली; नद्या, ओढे पुन्हा दुथडी भरून वाहणार!

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे, आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला कधी सुरूवात होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली; नद्या, ओढे पुन्हा दुथडी भरून वाहणार!
IMD Maharashtra Rain UpdateImage Credit source: Google
| Updated on: Jul 14, 2026 | 5:46 PM
Share

राज्याच्या हवामानात आठवडाभरापासून बदल झालेला आहे. जून महिन्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला होता. राजधानी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आठवडाभरापासून पावसाने अचानक दांडी मारली आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला कधी सुरूवात होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुढील 5 ते 7 दिवस पावसाची शक्यता नाही

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील 5 ते 7 दिवस संपूर्ण राज्याला पावसाची प्रतीक्षा कायम असणार आहे, या काळात राज्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या 4-5 दिवस तरी मुसळधार पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. मात्र तोसुद्धा सर्वदूर असण्याची शक्यता नाही.

मेघदूत अॅप वापरण्याचा सल्ला

राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, यावर बोलताना सानप यांनी म्हटले की, शेतकऱ्यांनी पावसाच्या आणि शेतीच्या नियोजनासाठी मेघदूत अॅपचा वापर करावा. या अॅपमध्ये हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयक माहिती मिळेलय एल निनोचा प्रभाव असला तरी पाऊस पडतो. मात्र तो सगळीकडे सारख्या प्रमाणात नसतो. या काळात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो.

संपूर्ण देशात 20 जुलैनंतर पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जुलैपर्यंत देशातील बहुतांश भागात मान्सूनचा वेग मंद राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती होण्याची शक्यता असून त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. असे झाल्यास पावसाची तूट भरून निघण्यास मदत होईल आणि खरीप पिके तसेच पेरणीच्या कामांनाही वेग मिळू शकतो. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीपासून वंचित रहावे लागणार आहे.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी