AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, तापमानातून दिलासा मिळाला का?

25 April 2023 Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमानाचा पार थोडा कमी झाला आहे. एकीकडे उन्हातून दिलासा मिळत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे.

25 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, तापमानातून दिलासा मिळाला का?
IMD
| Updated on: Apr 26, 2023 | 9:20 AM
Share

पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले होते. त्यातून सोमवारी थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. मार्च महिन्यानंतर आता संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील तीन- चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २५ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

राज्यात २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. कोकण अन् गोव्यात २५ रोजी हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर २६ ते २८ दरम्यान काही ठिकाणी जोरदार विजांचा कडकडाट मेघगर्जना व गारपीट होण्याची शक्यताही वर्तविली असून जोराचे वादळ देखील येवू शकते. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ आणि २८ रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट आहे. पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

तापमान वाढीतून किंचित दिलासा

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे . जळगावमध्ये सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंदवले गेले होते. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.

मुंबईकरांना दिलासा

राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईचे तापमान ३२ अंशावर होते. पुणे शहराचे तापमान ३६.१ अंशावर होते.

Maharashtra temperature
शहर तापमान
जळगाव 39
अकोला 38.3
मुंबई 32
पुणे 36.1
नागपूर 35.3
नाशिक

चंद्रपूर

36

38.2

चंद्रपूरला वादळी पावसाचा शाळेला फटका

चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकदरुर  येथील इंदिरा गांधी हायस्कूल वादळी वाऱ्याने उडून गेले. योगायोगाने  शाळेत कुणी हजर नसल्याने मोठी हानी टळली. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारी ऊन अन पाच वाजता नंतर वादळी पाऊस  जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे.  वादळी पावसाने या चार दिवसात अनेक घरांची पडझड झालेली आहे.

नाशिकला ऑरेंज अलर्ट

नाशिकला पुढचे चार दिवस पुन्हा धोक्याचे आहे. नाशिक जिल्ह्याला उद्यापासून पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिकला बेमोअमी पावसाचा पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

Follow Us
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.