AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांवर संकट, पुन्हा थंडी कधीपासून सुरु होणार?

महाराष्ट्रात सध्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, वाशिम आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुढील तीन ते चार दिवस हीच परिस्थिती राहील, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे. पुढील आठवड्यापासून थंडी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांवर संकट, पुन्हा थंडी कधीपासून सुरु होणार?
प्रातिनिधिक फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 06, 2024 | 7:31 PM
Share

महाराष्ट्रात सध्या हिवाळा सुरु आहे. पण हिवाळ्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अचानक पावसाची हजेरी लावली आहे. तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गरमी देखील वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या गरमीपासून आणि अवकाळी पावसापासून कधी मुक्ती मिळेल? याबाबत आम्ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सध्याच्या हवामानावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. काल नाशिकमध्ये 31 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या तीन-चार दिवसात सहा ते सात डिग्री तापमान वाढले. वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. आत्ताची परिस्थिती आहे तशी परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार असल्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल”, अशी महत्त्वाची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, राज्यात कालपासून आतापर्यंत कुठे आणि किती पाऊस पडला ते देखील जाणून घेऊयात.

वाशिममध्ये पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

वाशिम शहरासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाने वाशिम बाजार समितीमध्ये एकच धावपळ झाली. हा पाऊस पडत असल्याने तुरीच्या आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात आज मंगरुळपीर बाजार समितीत अचानक झालेल्या वादळी पावसामुळे ओट्याखालील सोयाबीन, तूर आणि इतर शेतमाल भिजला. योग्य साठवणूक सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने पिकवलेला माल हातचा गेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून, नुकसान भरपाईसाठी तातडीने मदतीची मागणी केली जात आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

नाशिक शहरात काल आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले. तर अनेक ठिकाणी अजून देखील पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. काल शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे नाशिक रोड आडगाव पंचवटी द्वारका परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले.. खरंतर दोन ते तीन तास आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय… मात्र 17ते 18 तास उलटून देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे तर अनेक रस्ते खड्डेमय झाले… या साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे… पावसाळा संपल्यानंतर डाग तुझी केलेल्या रस्त्यांना पुन्हा पावसामुळे खड्डे पडले

छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी अचानक पाऊस पडला. या पावसामुळे तुरीसह कांदा रोप आणि अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जाईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा