AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण या सगळ्यातून आजचं हवामान दिलासादायक आहे.

weather update : पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात कसं आहे हवामान, वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे भीषण परिणाम दिसले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा दुखी झाले आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण या सगळ्यातून आजचं हवामान दिलासादायक आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. (maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

सांगलीत झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अहमदनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. खरंतर, हवामान खात्याने आधीच अशा पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण आज 20 फेब्रुवारीला हवामान सामान्य आहे. आज राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कालच्या पावसाच्या थैमानानंतर वातावरण कोरडं आहे.

राज्यात कुठे कसं आहे हवामान?

उत्तर कोकण – उत्तर कोकणामध्ये 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा – इथं गेल्या दोन दिवसापासून वातवरण आयलेटेड आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान आयसोलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र – 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

मराठवाडा – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

पूर्व विदर्भ – इथं आज आयलेटेड असून उद्यापासून मात्र, हवामान कोरडं आहे.

पश्चिम विदर्भ – पश्चिम विदर्भात 20 ते पुढच्या 23 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पूर्व भारतातील राज्यांमध्ये आतापर्यंत कधीही पाऊस झाला नव्हता. परंतु त्या राज्यांमध्ये सध्या पावसाचे ढग दाटून आलेत. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. 1 जानेवारी ते 17 फेब्रुवारीच्या कालावधीत झालेल्या पावसाचा सरासरी विचार केल्यास बिहारमध्ये 97 %, झारखंडमध्ये 92 % पाऊस कमी पडलाय, तर पश्चिम बंगालमध्ये 91 टक्के कमी पाऊस पडलाय. त्याशिवाय ईशान्य राज्यांतील जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाला आहे.

विदर्भ आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळाची स्थिती

हवामानातील या बदलांची कारणे लक्षात घेतल्यास विदर्भ आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळाची स्थिती होती आणि दक्षिणेकडील द्विपकल्पपर्यंत हे वारे वाहत होते. ओडिशामध्ये एक चक्रीवादळ सक्रिय असल्याची प्राथमिक माहितीही समोर आली होती. या चक्रीवादळांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला होता.

20 फेब्रुवारीपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज

18 फेब्रुवारीनंतर पावसाचे ढग कमी होतील आणि 19 ते 20 फेब्रुवारीपासून हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. महाराष्ट्रासह, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात वेगाने जोरदार पाऊस, गडगडाटी वीज व वारा यांसारख्या घटना एप्रिलपासून सुरू होतात. एप्रिल ते जून या काळात कधी कधी हवामान बिघडलेले असते. (maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

संबंधित बातम्या – 

मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली

राज्य दूध उत्पादक संघानंतर सहकारी संघाचाही शेतकऱ्यांना दिलासा, दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ

Mumbai Corona update | मुंबईला कोरोनाचा विळखा, 823 नवे रुग्ण; चेंबूरमधील 4 इमारती सील

(maharashtra weather update from 20 feb till 23 feb weather is dry in maharashtra here is detail weather report)

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.